शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुचाकीवरील महिलेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:57 IST

मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मालवाहू ट्रक (ट्रेलर)ने दुचाकीस्वार महिलेला चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील लिंकरोड चौफुलीवर घडली. या अपघातात महिला जागीच ठार झाली, तर महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.याविषयी अधिक माहिती अशी की, राजू काशीनाथ सोनवणे (४०, रा. हरिकृपानगर, देवळाई परिसर) व त्यांची पत्नी संगीता सोनवणे हे दोघे दुचाकी क्रमांक एम.एच.२०, बी.ए.७२२२ वर स्वार होऊन परसोडा, ता. वैजापूर येथे वडिलांना भेटण्यासाठी चालले होते. बीड बायपासकडून लिंकरोडमार्गे वैजापूरकडे जात असताना सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास लिंकरोड चौफुलीजवळ समोरून जाणाºया मालवाहू ट्रक (ट्रेलर) क्रमांक एन.एल.०१, एल.६२९२ च्या चालकाने अचानक वळण घेतल्यामुळे दुचाकीस्वार राजू सोनवणे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दोघे पती-पत्नी ट्रकखाली सापडले. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली चिरडल्यामुळे संगीता सोनवणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच वाहतूक शाखेचे निरीक्षक मनोज पगारे, सहायक फौजदार ढवळे, पोकॉ. शमशुद्दीन कादरी, पोहेकॉ. कवडे, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोहेकॉ. जगदाळे आदींनी घटनास्थळ गाठून गंभीर जखमी राजू सोनवणे यास मदत करीत त्यास धीर दिला. या अपघातात गंभीर जखमी राजू सोनवणे यांना उपचारासाठी, तर ठार झालेल्या त्यांच्या पत्नी संगीता सोनवणे यांचे प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर मारहाणीच्या भीतीमुळे ट्रकचालक हा घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातानंतर लिंकरोड चौफुलीवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. याप्रकरणी जखमी राजू सोनवणे याचा चुलत भाऊ भरत सोनवणे याच्या तक्रारीवरून ट्रकचालक अजयकुमार बिहारीलाल (२२, रा. ईस्माईलपूर, पो.कारगापूर, ता. सोरावन, जि.अलाहाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास अटक करण्यात आली. या अपघातास कारणीभूत मालवाहू ट्रकमध्ये दोन मिनी ट्रकची वाहतूक करीत असताना हा अपघात घडून संगीता सोनवणे यांचा या अपघातात बळी गेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गौतम खंडागळे करीत आहेत.