शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शासकीय इमारतीच पुनर्भरणाशिवाय

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : पुनर्भरणाच्या चळवळीत प्रशासकीय उदासीनता दिसून येत असून, शहरातील अपवाद वगळता एकाही शासकीय इमारतीवर हा प्रकल्प उभारलेला नाही.

परभणी : पुनर्भरणाच्या चळवळीत प्रशासकीय उदासीनता दिसून येत असून, शहरातील अपवाद वगळता एकाही शासकीय इमारतीवर हा प्रकल्प उभारलेला नाही. एकीकडे पुनर्भरणासाठी जनजागरण केले जात असताना दुसरीकडे सरकारी यंत्रणेतील उदासीनता चळवळीसाठी गतिरोधक ठरत आहे.पाणी समस्या ही आता कुठल्या एका गावापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित नाही. संपूर्ण राज्याची ही समस्या झाली आहे. दरवर्षी पाणीटंचाई गाजत असते. शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणेला ही टंचाई निवारण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. लाखो रुपयांचा निधी पाण्यासाठी वापरला जातो. जलस्त्रोतांचे बळकटीकरण करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनरभरण हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी शासनातर्फेही वेळोवेळी जनजागरण केले जाते. परंतु जनजागरण करीत असताना शासकीय कार्यालयांच्या इमारती मात्र या प्रकल्पाविनाच उभारल्याचे समोर येत आहे. परभणी शहराचा विचार करता शहरामध्ये ६० ते ७० शासकीय कार्यालये आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, महानगरपालिका, पोलिस अधीक्षक कार्यालय या शासकीय कार्यालयांबरोबरच विविध निमशासकीय संस्था, बँक, शाळांच्या इमारती आहेत. यापैकी बहुतांश इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुनर्भरणाकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचेच दिसत आहे. नव्याने इमारत बांधकाम करावयाचे झाल्यास बांधकाम परवानगी घेताना पुनर्भरण प्रकल्प उभारणे बंधनकारक आहे. त्यानंतरच महानगरपालिका बांधकाम पूर्ण झाल्याची परवानगी देते. परंतु अद्यापपर्यंत एकाही शासकीय कार्यालयाने पुनर्भरण झाल्याचे मनपाला कळविले नाही. प्रशासकीय स्तरावरुन गती मिळाल्यास पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास वेळ लागणार नाही. (प्रतिनिधी)मनपाकडे नाही माहितीशहरातील किती शासकीय इमारतींवर पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले आहे, याची माहिती मनपाकडे उपलब्ध नाही. परंतु आम्ही बांधकाम परवाना देताना पुनर्भरण करुन घेणे बंधनकारक करतो, असे सांगण्यात आले. आणखी विशेष बाब म्हणजे महानगरपालिकेच्या इमारतीवरही पुनर्भरण प्रकल्प उभारलेला नाही. यावरुन याविषयीची उदासीनता दिसून येते.पोलिस अधीक्षक कार्यालयाचा अपवादपरभणी शहरात पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत नव्याने उभारली आहे. केवळ पोलिस अधीक्षक कार्यालयानेच महानगरपालिकेकडे बांधकाम पूर्ण झाल्याचे पत्र दिले असून, या ठिकाणी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण केले असल्याचे मनपा सूत्रांकडून सांगण्यात आले.जलमित्रांचे प्रयत्नकाही दिवसांपूर्वी शहरात जलमित्र संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या माध्यमातून जलप्रेमी नागरिक एकत्र आले असून, त्यांनी शहरात पुनरभरण करण्याविषयी जनजागृती सुरू केली आहे.विशेष म्हणजे, घरोघरी फिरुन पुनर्भरण करण्याचा आग्रह केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक निवासी इमारतींवर आता पुनर्भरण प्रकल्प कार्यान्वित झाल्याचे दिसून येत आहे. या जलमित्रांना प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांची साथ मिळाल्यास या चळवळीला गती मिळण्यास वेळ लागणार नाही.