शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे पर्व संपले; चुरशीच्या लढतीत जलील यांचा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 21:08 IST

विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

औरंगाबाद : राज्यात लक्षवेधी ठरलेल्या औरंगाबाद मतदारसंघातील चौरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडी - एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या लढतीत शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत आघाडी मिळवली होती. मात्र, शेवटी जलील यांनी विजय खेचून आणला. 

मतमोजणीत अगदी सुरुवातीपासूनच जलील यांनी आघाडी राखली. विशेष म्हणजे १७ व्या फेरीपर्यंत लढत जलील आणि जाधव अशीच राहिली, खैरे थेट तिसऱ्या क्रमांकावर गेले तर झांबड शेवटपर्यंत चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ व्या फेरीनंतर खैरे यांची मते वाढत गेली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर आले. तर २१ व्या फेरीअखेर खैरे यांनी जोरदार मुसंडी मारत जलील यांच्यावर ७०० मतांची आघाडी घेतली. कधी खैरे पुढे तर कधी जलील असे होत शेवटच्या पाच फेऱ्या अगदी T२० सामन्यांसारख्या झाल्या. शेवटच्या दोन फेऱ्यात जलील यांनी निर्णायक आघाडी घेत विजय खेचून आणला. या विजयासह औरंगाबादमधील खैरे यांचे मागील चार टर्मपासून सुरु पर्व संपले

मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवले होते.  यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली. कॉंग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. तर  वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन वेगळा प्रयोग केला. तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन जाधव यांनी उडी घेत आणखी चुरस वाढवली. विजयानंतर जलील यांनी नागरिकांना बदल हवा होता, सर्वाना सोबत घेऊन मतदार संघाच्या विकास करण्याचे काम करू अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

मतदारसंघः औरंगाबादविजयी उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी मतंः 388373

पराभूत उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे पक्षः शिवसेना मतंः 383186

पराभूत उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष मतंः 282547

पराभूत उमेदवाराचे नावः सुभाष झांबड पक्षः कॉंग्रेस मतंः 91401

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झाले होते. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019