शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे खंडित झाला ४० गावांतील वीजपुरवठा

By admin | Updated: June 8, 2014 00:55 IST

औराद शहाजानी : परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गुरुवारी व शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वादळात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्या आहेत. १४० पोल पडल्याने ४० गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गावे अंधारात आहेत. शिवाय, पंडित वीरभद्रजी आर्य विद्यालयातील सात वर्ग खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत.औराद शहाजानी, हलगरा, तगरखेडा, माळेगाव, वांजरखेडा, सावरी, शेळगी, कोटमाळसह अन्य गावांत शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वारा व पाऊस झाला. या वादळात जुन्या औराद गावातील जवळपास ११० लोकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. वीजपुरवठा करणाऱ्या तारा तुटल्या आहेत. तसेच पोलही उन्मळून पडले आहेत. लातूर-बीदर रोडवरील फर्टिलायझर्स, सिमेंट व हॉटेल आदी दुकानांवरील पत्रे उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसात चार व्यापाऱ्यांचे सिमेंट व खत पावसाने भिजले आहे. औराद शहाजानीत रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गावातील काही भागांत वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. हलगरा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर रात्री वीज कोसळली. यामुळे त्या उपकेंद्राअंतर्गत असलेल्या सर्व गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. मागील वर्षी ६ व ७ जून रोजी औराद परिसरात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला होता. त्यावेळीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वर्षभरापूर्वी पोल उन्मळून पडले होते. ते पडलेले पोल अद्यापही त्याच अवस्थेत आहेत. महावितरणने दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांना विजेच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तेरणा नदीकाठावरील अनेक पोल उन्मळून पडलेले असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. वर्षभरापासून येथील शेतकऱ्यांची ओरड आहे. गुरुवारी झालेल्या वादळी वारा व पावसात अनेकांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)काम सुरू आहे...विस्कळीत झालेला विद्युतपुरवठा सुरू करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. पोलही उन्मळून पडले आहेत. तुटलेल्या तारा जोडणीचे काम सुरू असल्याचे कनिष्ठ अभियंता एस.बी. डोंगरे यांनी सांगितले. मागील वर्षी वादळात पडलेले पोल उभे करण्याचे काम सुरु असल्याचेही ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़