शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

वादळी वारे सुटताच वीज गुल

By admin | Updated: May 21, 2016 00:11 IST

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठा गुरुवारी रात्री पुन्हा खंडित झाला.

औरंगाबाद : शहरातील वीजपुरवठा गुरुवारी रात्री पुन्हा खंडित झाला. वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळताच गारखेडा परिसर, सातारा-देवळाई, हडको, औरंगपुरा, नंदनवन कॉलनी आदी भागांतील वसाहती अंधारात बुडल्या. काही भागात अर्धा तास तर काही भागात तासभर वीज गुल राहिली. दोन दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू झाला. मंगळवारी रात्री निम्मे शहर तब्बल एक ते दीड तास अंधारात बुडाले होते. त्यानंतर आज रात्रीही शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी अचानक वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. पावसाचा थोडा शिडकावाही झाला. त्यामुळे थोड्याच वेळात गारखेडा, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर, सातारा, देवळाई, हडकोतील काही वसाहती तसेच औरंगपुरा, रेल्वेस्टेशन, नंदनवन कॉलनी आदी भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. सातारा-देवळाई आणि हडकोतील वसाहतींमध्ये अर्ध्या तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. शहरातील मध्यवर्ती भागातील वसाहतींमध्ये मात्र, काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. गारखेड्यातील वसाहतींमध्ये अर्धा ते पाऊण तास वीज नव्हती.