शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जिल्हा परिषदेच्या योजना मार्गी लागतील? वर्षात दोन निवडणुकांच्या आचारसंहितांचा अडसर

By विजय सरवदे | Updated: July 26, 2024 20:10 IST

दीड महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर : या आर्थिक वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या उपकरातून राबविण्यात येणाऱ्या तसेच शासकीय योजना मार्गी लागतील का, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.

जि. प.ने मार्च महिन्यात अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर समाज कल्याण विभागांतर्गत उपकरातून ४ कोटी ३० लाख १२ हजारांच्या, तर दिव्यांगांसाठी १ कोटी १५ लाख ११ हजारांच्या योजना राबविण्याचा निर्णय जाहीर केला. यामध्ये ११९ लाभार्थ्यांना संगणक अथवा लॅपटॉप वितरित करणे, ९२ तरुण व ९२ महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे, ८६ पशुपालकांना कडबा कुट्टी यंत्रांचा पुरवठा करणे, ३२२ महिलांना पिको फाॅल मशीन, दुग्ध व्यवसायासाठी १२५ जणांना गाय किंवा म्हशी वाटप करणे, १०० महिलांना मिरची कांडप यंत्रांचा पुरवठा करणे, २०० जणांना शेळी गट वाटप करणे, याशिवाय ४१ दिव्यांगांना विनाअट घरकुल देणे, २५० अतितीव्र निराश्रित दिव्यांगांना १० हजार रुपयांचा निर्वाह भत्ता वाटप करणे, ३५ अस्थिव्यंगांना स्वयंचलित तीनचाकी सायकल वाटप करण्याचा समावेश आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत या योजना अडकल्यामुळे बहुतांश लाभार्थी १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करू शकले नव्हते. त्यांच्यासाठी आता २५ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर अर्जांची छाननी, पात्र-अपात्र अर्जांची निवड, पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करणे, या प्रक्रियेसाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी जाईल. तत्पूर्वी, दीड महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थी निवडीची प्रक्रिया पुढे दोन-तीन महिने जाऊ शकते.

विहिरींसाठी दोन वर्षांची मुदतजि. प. कृषी विभागामार्फत विशेष घटक योजनेंतर्गत मागासवर्गीय अल्पभूधारक शेतकऱ्यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन’ आणि ‘बिरसा मुंडा कृषिक्रांती’ या दोन योजनांच्या माध्यमातून विहिरींसाठी अनुदान दिले जाते. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून दर तीन महिन्यांमध्ये सोडत पद्धतीने लाभार्थी निश्चित केले जातात. यंदा कृषी स्वावलंबन योजनेसाठी १५ कोटी, तर कृषिक्रांती योजनेत साधारणपणे १ कोटी एवढ्या निधीची तरतूद आहे. पात्र, लाभार्थ्यांना विहीर खोदण्यासाठी दोन वर्षांची मुदत असल्याचे जि. प.चे कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद