शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण अधिक होत असेल तर अशा वाहनांची पुनर्नोंदणी न करता ते थेट भंगारात काढले जाणार आहे. तुम्ही वापरत असलेले जुने वाहन अनफिट असेल तर ते या धोरणानुसार भंगारात काढले जाऊ शकते.

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या औरंगाबादेत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. जूनअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणीकृत वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन स्क्रॅप धोरणानुसार १५ वर्षांपूर्वीचे वाहन भंगारात काढले जाऊ शकते. खाजगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या बाबतीत वेगवेगळा नियम आहे. व्यावसायिक प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहन फिट नसेल तर आरटीओ अधिकारी त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देत नाहीत. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही वाहनाची पुनर्नोंदणी केली जात नाही.

--------------------------------

चौकट

१५ वर्षांची जुनी खासगी वाहने- १ लाख ९६ हजार २३९

१० वर्षांची जुनी खासगी वाहने- ३ लाख ७७ हजार ८५४

१० वर्षांची जुनी व्यावसायिक वाहने - ८९ हजार ८९५

-------------

वाहन सुस्थितीत असेल तरच मिळेल फिटनेस प्रमाणपत्र

१५ वर्षांनंतरही वाहन वापरायचे अथवा विक्री करायचे असेल तर आरटीओ कार्यालयात वाहन न्यावे लागते. आरटीओ अधिकारी वाहनाच्या इंजिनसह बॉडी सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहून वाहन चालवून पाहतात. वाहनामुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण या सर्वांचा अभ्यास करून ते वाहन फिट आहे अथवा अनफिट याविषयी निर्णय घेतात. सुस्थितीतील खाजगी वाहनांची पाच वर्षांसाठी पुनर्नोंदणी केली जाते. अनफिट वाहन लगेच भंगारात काढण्याचे आदेश दिले जातात.

------------------------

भंगारातील हजारो रिक्षा, दुचाकी वाहने रस्त्यावर

ज्या मालकाला त्याचे वाहन १५ वर्षांनंतरही वापरायचे आहे अथवा ते कुणाला विक्री केल्याचा अधिकृत व्यवहार करायचा आहे, अशी वाहनेच आरटीओकडे येतात, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ वर्षांनंतर दुचाकीमालक त्यांचे वाहन एक तर बॉण्डपेपरवर विक्री करतात; परंतु असे वाहन आरटीओ दप्तरी मूळ मालकाच्या नावेच असते. हजारो दुचाकी आणि मालवाहू, तसेच रिक्षा विना फिटनेसच्या रस्त्यावर धावतात. अशी वाहने आढळल्यास आरटीओ अधिकारी ते जप्त करतात.

------------------------------

कोट...

...तर द्यावा लागतो ग्रीन टॅक्स

१५ वर्षांनंतरही वाहन वापरण्यास योग्य असेल तर फिटनेस प्रमाणपत्र देऊन त्या खाजगी वाहनाची ५ वर्षांकरिता पुर्नोंदणी करता येते. याकरिता वाहनमालकाला ग्रीन टॅक्स आरटीओ कार्यालयात भरावा लागतो.

संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद