शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण अधिक होत असेल तर अशा वाहनांची पुनर्नोंदणी न करता ते थेट भंगारात काढले जाणार आहे. तुम्ही वापरत असलेले जुने वाहन अनफिट असेल तर ते या धोरणानुसार भंगारात काढले जाऊ शकते.

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या औरंगाबादेत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. जूनअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणीकृत वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन स्क्रॅप धोरणानुसार १५ वर्षांपूर्वीचे वाहन भंगारात काढले जाऊ शकते. खाजगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या बाबतीत वेगवेगळा नियम आहे. व्यावसायिक प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहन फिट नसेल तर आरटीओ अधिकारी त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देत नाहीत. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही वाहनाची पुनर्नोंदणी केली जात नाही.

--------------------------------

चौकट

१५ वर्षांची जुनी खासगी वाहने- १ लाख ९६ हजार २३९

१० वर्षांची जुनी खासगी वाहने- ३ लाख ७७ हजार ८५४

१० वर्षांची जुनी व्यावसायिक वाहने - ८९ हजार ८९५

-------------

वाहन सुस्थितीत असेल तरच मिळेल फिटनेस प्रमाणपत्र

१५ वर्षांनंतरही वाहन वापरायचे अथवा विक्री करायचे असेल तर आरटीओ कार्यालयात वाहन न्यावे लागते. आरटीओ अधिकारी वाहनाच्या इंजिनसह बॉडी सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहून वाहन चालवून पाहतात. वाहनामुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण या सर्वांचा अभ्यास करून ते वाहन फिट आहे अथवा अनफिट याविषयी निर्णय घेतात. सुस्थितीतील खाजगी वाहनांची पाच वर्षांसाठी पुनर्नोंदणी केली जाते. अनफिट वाहन लगेच भंगारात काढण्याचे आदेश दिले जातात.

------------------------

भंगारातील हजारो रिक्षा, दुचाकी वाहने रस्त्यावर

ज्या मालकाला त्याचे वाहन १५ वर्षांनंतरही वापरायचे आहे अथवा ते कुणाला विक्री केल्याचा अधिकृत व्यवहार करायचा आहे, अशी वाहनेच आरटीओकडे येतात, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ वर्षांनंतर दुचाकीमालक त्यांचे वाहन एक तर बॉण्डपेपरवर विक्री करतात; परंतु असे वाहन आरटीओ दप्तरी मूळ मालकाच्या नावेच असते. हजारो दुचाकी आणि मालवाहू, तसेच रिक्षा विना फिटनेसच्या रस्त्यावर धावतात. अशी वाहने आढळल्यास आरटीओ अधिकारी ते जप्त करतात.

------------------------------

कोट...

...तर द्यावा लागतो ग्रीन टॅक्स

१५ वर्षांनंतरही वाहन वापरण्यास योग्य असेल तर फिटनेस प्रमाणपत्र देऊन त्या खाजगी वाहनाची ५ वर्षांकरिता पुर्नोंदणी करता येते. याकरिता वाहनमालकाला ग्रीन टॅक्स आरटीओ कार्यालयात भरावा लागतो.

संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद