शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

तुम्ही वापरत असलेले वाहन भंगारात निघणार काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : केंद्र सरकारने वाहन स्क्रॅप धोरण आणले आहे. १५ वर्षे जुने वाहन वापरायोग्य नसेल, प्रदूषण अधिक होत असेल तर अशा वाहनांची पुनर्नोंदणी न करता ते थेट भंगारात काढले जाणार आहे. तुम्ही वापरत असलेले जुने वाहन अनफिट असेल तर ते या धोरणानुसार भंगारात काढले जाऊ शकते.

औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या औरंगाबादेत वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. जूनअखेरपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) नोंदणीकृत वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांहून अधिक आहे. केंद्र सरकारने आणलेल्या नवीन स्क्रॅप धोरणानुसार १५ वर्षांपूर्वीचे वाहन भंगारात काढले जाऊ शकते. खाजगी आणि व्यावसायिक वापराच्या वाहनांच्या बाबतीत वेगवेगळा नियम आहे. व्यावसायिक प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षी आरटीओचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाहन फिट नसेल तर आरटीओ अधिकारी त्या वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देत नाहीत. फिटनेस प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही वाहनाची पुनर्नोंदणी केली जात नाही.

--------------------------------

चौकट

१५ वर्षांची जुनी खासगी वाहने- १ लाख ९६ हजार २३९

१० वर्षांची जुनी खासगी वाहने- ३ लाख ७७ हजार ८५४

१० वर्षांची जुनी व्यावसायिक वाहने - ८९ हजार ८९५

-------------

वाहन सुस्थितीत असेल तरच मिळेल फिटनेस प्रमाणपत्र

१५ वर्षांनंतरही वाहन वापरायचे अथवा विक्री करायचे असेल तर आरटीओ कार्यालयात वाहन न्यावे लागते. आरटीओ अधिकारी वाहनाच्या इंजिनसह बॉडी सुस्थितीत आहे अथवा नाही, हे पाहून वाहन चालवून पाहतात. वाहनामुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण या सर्वांचा अभ्यास करून ते वाहन फिट आहे अथवा अनफिट याविषयी निर्णय घेतात. सुस्थितीतील खाजगी वाहनांची पाच वर्षांसाठी पुनर्नोंदणी केली जाते. अनफिट वाहन लगेच भंगारात काढण्याचे आदेश दिले जातात.

------------------------

भंगारातील हजारो रिक्षा, दुचाकी वाहने रस्त्यावर

ज्या मालकाला त्याचे वाहन १५ वर्षांनंतरही वापरायचे आहे अथवा ते कुणाला विक्री केल्याचा अधिकृत व्यवहार करायचा आहे, अशी वाहनेच आरटीओकडे येतात, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले. याचे प्रमाण केवळ २ ते ३ टक्के असल्याचे त्यांनी नमूद केले. १५ वर्षांनंतर दुचाकीमालक त्यांचे वाहन एक तर बॉण्डपेपरवर विक्री करतात; परंतु असे वाहन आरटीओ दप्तरी मूळ मालकाच्या नावेच असते. हजारो दुचाकी आणि मालवाहू, तसेच रिक्षा विना फिटनेसच्या रस्त्यावर धावतात. अशी वाहने आढळल्यास आरटीओ अधिकारी ते जप्त करतात.

------------------------------

कोट...

...तर द्यावा लागतो ग्रीन टॅक्स

१५ वर्षांनंतरही वाहन वापरण्यास योग्य असेल तर फिटनेस प्रमाणपत्र देऊन त्या खाजगी वाहनाची ५ वर्षांकरिता पुर्नोंदणी करता येते. याकरिता वाहनमालकाला ग्रीन टॅक्स आरटीओ कार्यालयात भरावा लागतो.

संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद