शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, गुंतवणुकीस अग्रक्रम - डॉ. भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 10:25 IST

औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे.

विकास राऊतऔरंगाबाद : केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पदभार स्वीकारला. औरंगाबाद जिल्ह्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प तरतुदींसह यावेत, यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी ‘लोकमत’जवळ स्पष्ट केले. खात्याचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक माहितीनुसार आपल्या योजनांचे स्पष्टीकरण केले. औरंगाबाद जिल्ह्यासाठी आणि शहरासाठी काय करता येईल, आपल्या काय संकल्पना आहेत, याबाबत राज्यमंत्री डॉ. कराड यांना विचारले असता  त्यांनी सांगितले की, औद्योगिक क्षेत्राचा मागील सहा महिन्यांपासून मी आढावा घेत आहे. आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर डीएमआयसीमध्ये उभारले जावे, यासाठी भरीव तरतूद केंद्र शासनाकडून मिळेल, या दिशेने प्राधान्याने प्रयत्न करण्यात येतील. औरंगाबाद येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा कशा वाढतील, यात सर्वाधिक लक्ष घालणार आहे. डीएमआयसीसाठी गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे, उद्योग यावेत, येथील उपलब्ध सुविधांचे जगभर मार्केटिंग करण्यासाठी विशेष एजन्सी असावी, याबाबत उद्योग खात्याशी बोलून चर्चा करण्यात येईल, असे ते म्हणाले.

अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा दिसेल औरंगाबाद-पुणे या महामार्गाचे रुंदीकरण करणे, तसेच औट्रम घाटातील बोगद्याच्या कामाला गती मिळेल, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करेन. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्पात औरंगाबाद जिल्हा सर्व बाजूने यावा, असाच माझा प्रयत्न राहील.- डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री 

 

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAurangabadऔरंगाबाद