शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
4
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
5
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
6
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
7
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
8
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
9
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
10
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
11
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
12
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
13
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
14
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
15
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
16
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
17
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
18
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
19
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पथदिवे सुरू होतील का ?

By admin | Updated: May 13, 2017 00:34 IST

जालना : संपूर्ण मराठवाड्यात मोठी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख आहे. असे असले तरी तब्बल पाच वर्षांपासून पथदिवे बंदावस्थेत आहेत.

जालना : संपूर्ण मराठवाड्यात मोठी बाजारपेठ म्हणून शहराची ओळख आहे. असे असले तरी तब्बल पाच वर्षांपासून पथदिवे बंदावस्थेत आहेत. त्यामुळे शहर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेले असते. वीजबिलाची थकबाकी तब्बल दहा कोटींवर गेल्याने ही स्थिती ओढावली आहे. तर स्वच्छतेचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत असून, रस्ते दुरूस्तीसोबतच वीज बिलाचा भरणा करणे उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने पालिकेला कठीण होत आहे. शहरात विकासाचा प्रकाशकिरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणतील का? अशी अपेक्षा शहरवासियांना आहे. जालना शहराची लोकसंख्या सुमारे तीन लाख झाली आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविताना पालिकेची पुरती दमछाक होत आहे. बंद पथदिवे आणि अस्वच्छता या दोन महत्वाच्या प्रश्नांमुळे नागरिकांतून नाराजीचा सूर आहे. शहरात पथदिवे आणि स्वच्छता या दोन मुद्यांवर नगर पालिकेकडून थातूरमातूर कामे करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असतो. शहरत गत पाच वर्षांपासून पथदिवे बंद आहेत. काही भागात प्रकाश तर काही ठिकाणी अंधार असतो. नगर पालिकेकडे दहा ते बारा वर्षांपासून पथदिव्यांच्या बिलापोटी तब्बल १० कोटींची थकबाकी आहे. पालिकेने गत पाच वर्षांत व्याज व दंड मिळून ५ कोटी १० लाख रूपये महावितरणकडे भरले आहेत. मात्र मूळ रक्कम तशीच राहत असल्याने व्याज वाढत आहे. परिणामी पथदिवे बंदच आहेत. शहरात सुमारे १३ हजार पथदिवे आहेत. यातील ३० ते ४० टक्के पथदिवे सुरू आहेत. ते कसे सुरू आहेत याची माहिती पालिका अथवा महावितरणलाही नाही. थकबाकी पोटी पथदिव्यांचा पुरवठा बंद असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगतात. एकूणच पथदिव्यांची थकबाकी पालिकेला पेलवत नसल्याने शहरवासियांना अंधाराचा सामना करावा लागतो आहे. पथदिव्यांच्या थकबाकीपोटी पालिका आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांत अनेक चर्चेच्या फेऱ्या झडल्या. मात्र तोडगा निघू शकलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उर्जामंत्र्यांना मध्यस्थी करण्यास सांगून शहरातील पथदिवे प्रकाशमान करावेत, अशी अपेक्षा जालनेकरांतून व्यक्त होत आहे. शहराच्या १४ झोनपैकी दोन झोनमध्ये जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५० किमी जलवाहिनी अंथरली आहे. या कामाचा आराखडा मात्र तयार नसल्याचे समजते.प्रत्येक विभागात सोयीनुसार हा आराखडा तयार करून काम करण्यात येत आहे.