शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
4
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
5
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
6
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
7
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
8
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
11
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
12
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
13
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
14
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
15
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
16
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
17
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
18
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
19
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
20
“विधान परिषदेतील नियम, परंपरा आणि चर्चांमुळे लोकशाही बळकट”: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना पालिकेच्या अधिकाऱ्यांना पळविणार का?

By गजानन दिवाण | Updated: May 31, 2018 21:33 IST

शिवसेनेचे राजकारणाचे गणित बदलले आहे आणि मराठी माणसांनीही ते ओळखले आहे.

गजानन दिवाणमुंबई पालिकेत शिवसेनेचीच सत्ता असायला हवी, हे मत शिवसैनिकांचे असायचेच. मुंबईत आणि मुंबईबाहेर राहणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसाचेही हेच मत असायचे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनाही हेच वाटायचे. मुंबईत मराठी माणूस टिकवायचा असेल तर सत्तेत शिवसेनाच असायला हवी, यावर सर्व पक्षांतील मराठीप्रेमींचे एकमत असायचे. त्यामुळेच गेल्या काही दशकांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता राहिली आहे. आता चित्र बदलत आहे. मराठी माणूस सेनेबाबत तेवढा भावनिक होताना दिसत नाही आणि सेनाही मराठीच्या मुद्यावर तेवढी भावनिक दिसत नाही. शिवसेनेचे राजकारणाचे गणित बदलले आहे आणि मराठी माणसांनीही ते ओळखले आहे.महाराष्ट्रात असो वा राज्याबाहेर सर्वसामान्य मराठी माणसाच्या मदतीला सर्वात आधी धावतो तो शिवसैनिक. रूग्णालय असो वा एखादे शासकीय कार्यालय. बसस्थानक असो वा रेल्वेस्थानक. मराठी माणसासाठी वाट्टेल ते करणारा असतो तोही शिवसैनिकच. कमीअधिक असेल, पण राज्यभरात सर्वांची भावना हीच होती. आता परिस्थिती काहीशी बदलली आहे. नुसत्याच सतरंज्या उचलून, नेत्याच्या मागे फिरून आणि असे सामाजिक काम करून राजकारणाचे दिवस कधीच गेले हे शिवसेनेच्या नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांनीही जाणले आहे. म्हणून सर्वसमान्यांच्या मदतीला धावणारा शिवसैनिक कमी झाला आहे. केवळ सर्वसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर येणारी शिवसेनाही आता वेगवेगळे हित जोपासताना दिसत आहे.औरंगाबादेत बुधवारी क्रीडा संकुलावर शिवसेनेने केलेले आंदोलन त्याचाच भाग दिसत आहे. २०१० साली हे क्रीडा संकुल सुरू झाले. तेव्हापासून कुठल्याच प्रश्नी शिवसेनेने या क्रीडा संकुलावरील धूळ झाडली नाही. प्रश्न नव्हते का, तर तसे अजिबात नाही. ‘लोकमत’ने क्रीडा संकुलातील गैरसोयींबद्दल गेल्या दोन वर्षांत अनेक मालिका लिहील्या. बातम्या दिल्या. पाण्याची समस्या, शौचालयांमधील अस्वच्छता असे अनेक प्रश्न हाताळले. त्याची दखल घेऊन क्रीडा संकुल प्रशासनानेही त्यात सुधारणा केली. त्यावेळी ही शिवसेना कुठेच दिसली नाही. यातील एकाही प्रश्नावर सेनेने आंदोलन केले नाही. औरंगाबादेत कचराकोंडीने शंभरी ओलांडली. शहरात जागोजागी उकिरडे निर्माण झाले आहेत. येथील दूर्गंधी-अस्वच्छता सेनेला अजिबात दिसली नाही. सेनेच्या कुठल्याही नेत्याने या प्रश्नावर पालिकेच्या अधिकाºयाला पळविले नाही वा कुठला जाब विचारला नाही. पूर्ण शहराचे आरोग्य कचराकोंडीमुळे बिघडले असताना क्रीडा संकुलातील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवरील धूळ शिवसेनेला महत्त्वाची का वाटली, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही.शिवसेनेने सुरूवातीपासूनच औरंगाबादवर प्रचंड प्रेम केले. औरंगाबादकरांनीही प्रत्येकवेळी सेनेला साथ देत या प्रेमाला पुरेपूर साद दिली. महापालिका असो वा खासदारकी, औरंगाबादकरांनी डोळे झाकून सेनेला साथ दिली. बदल्यात औरंगाबादकरांना काय मिळाले? जायकवाडीत भरपूर पाणी असूनही पाण्याचा प्रश्न मिटला नाही. शहरात कुटुंबासह जावे असे गार्डन नाही. एकमेव असलेल्या सिद्धार्थ गार्डनलाही पालिकेला जपता आले नाही. येथील प्राणीसंग्रहालयाची मान्यता रद्द होण्याची वेळ आली. पर्यटनाच्या राजधानीला शोभतील असे रस्ते नाहीत. पर्यटनातून अनेक गोष्टी करता येऊ शकतात, त्याचे ब्रॅडिंगदेखील करता आले नाही. शहर बससेवेचा प्रश्न सोडविता आला नाही. समस्यांची यादी सांगायची ती किती?शहरासमोर एवढ्या मोठ्या समस्यांचा डोंगर उभा असताना शिवसेनेला क्रीडा संकुलातील धुळीचा प्रश्न मोठा वाटला. त्या धुळीची जाणीव व्हावी म्हणून सेनेने बुधवारी दम भरीत क्रीडा अधिकाºयांनाच ट्रॅकवर पळविले. शहरातील कुठल्याच प्रश्नावर हे धाडस न दाखविणारी शिवसेना चक्क क्रीडा संकुलावर का पोहोचली, याचा विचार करीत असतानाच बदलीचा हंगाम सुरू असल्याची आठवण एका सेनेच्याच कार्यकत्याने करून दिली. शिवसेनेची मराठी माणूस आणि त्याच्या समस्यांविषयीची तळमळ याचा इतिहास माहित असल्याने मला हे पटले नाही. पण, भूतकाळच तो. वर्तमानाचे काय सांगणार? 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना