शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

वाळूज बाजारतळावरील अतिक्रमण हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:15 IST

वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

वाळूज महानगर : वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सदरील अतिक्रमणे हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पोलीस, महसूल आदी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पाठविला आहे.

वाळूज येथील गट क्रमांक ३४० व ३४१ या शासकीय गायरान जमिनीवर तीन ते चार दशकांपासून आठवडी बाजार भरत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी या आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात येतो. यातून ग्रामपंचायतीला दरवर्षी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपन नसल्याने बाजाराच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहे.

गावातील जवळपास १६५ नागरिकांनी कच्चे तसेच पक्के बांधकामे केली आहेत. यामुळे आठवडी बाजारात पाले-भाज्या व अन्न-धान्य विक्रीसाठी येणाºया शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी गतवर्षी १४ मार्च रोजी ग्रामपंचायतीला दिले. मात्र अद्याप अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.

सदरील अतिक्रमणे हटविण्याबाबत नियोजनासाठी तहसीलदारांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस निरीक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने २९ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे पाठविला आहे. तहसीलदारांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर अतिक्रमण हटविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सरपंच पपीनकुमार माने, ग्रामविकास अधिकारी एस.एसी.लव्हाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण