शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

वाळूज बाजारतळावरील अतिक्रमण हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 19:15 IST

वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

वाळूज महानगर : वाळूजच्या आठवडी बाजारतळ परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सदरील अतिक्रमणे हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तहसीलदारांनी पोलीस, महसूल आदी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने तहसीलदारांना पाठविला आहे.

वाळूज येथील गट क्रमांक ३४० व ३४१ या शासकीय गायरान जमिनीवर तीन ते चार दशकांपासून आठवडी बाजार भरत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी या आठवडी बाजाराचा लिलाव करण्यात येतो. यातून ग्रामपंचायतीला दरवर्षी ७ ते ८ लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, संरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपन नसल्याने बाजाराच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहे.

गावातील जवळपास १६५ नागरिकांनी कच्चे तसेच पक्के बांधकामे केली आहेत. यामुळे आठवडी बाजारात पाले-भाज्या व अन्न-धान्य विक्रीसाठी येणाºया शेतकरी व व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी गतवर्षी १४ मार्च रोजी ग्रामपंचायतीला दिले. मात्र अद्याप अतिक्रमणे हटविण्यात आली नाहीत.

सदरील अतिक्रमणे हटविण्याबाबत नियोजनासाठी तहसीलदारांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गटविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलिस निरीक्षक यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, असा प्रस्ताव ग्रामपंचायतीने २९ एप्रिल रोजी तहसीलदारांकडे पाठविला आहे. तहसीलदारांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर अतिक्रमण हटविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे सरपंच पपीनकुमार माने, ग्रामविकास अधिकारी एस.एसी.लव्हाळे यांनी सांगितले. 

टॅग्स :WalujवाळूजEnchroachmentअतिक्रमण