शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे नाशिक मराठवाड्याला पाणी देईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 18:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठवाड्याला ‘सुजलाम्-सुफलाम्’ करण्याचे स्वप्न दाखवत दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून ५० टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली; मात्र याबाबत काहीच तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने जलअभ्यासकांनी या घोषणेविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे पाणी आले तरी नाशिकमधून ते मराठवाड्याला सोडले जाईल का, असा सवाल त्यांनी विचारला.

ठळक मुद्देदमणगंगा-पिंजाळ प्रकल्पजलतज्ज्ञांनी उपस्थित केले प्रश्न

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मराठवाड्याला ‘सुजलाम्-सुफलाम्’ करण्याचे स्वप्न दाखवत दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून ५० टीएमसी पाणी देण्याची घोषणा केली; मात्र याबाबत काहीच तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने जलअभ्यासकांनी या घोषणेविषयी शंका उपस्थित केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे पाणी आले तरी नाशिकमधून ते मराठवाड्याला सोडले जाईल का, असा सवाल त्यांनी विचारला.मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शं. आ. नागरे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेतून नाशिक व मराठवाड्यातील पाणी वाटपाविषयी स्पष्टपणे भाष्य करण्यात आलेले नाही. सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये नाशिक-नगर आणि मराठवाड्याचे पाण्यावरून भांडण सुरू असताना येणाºया दमणगंगेच्या जादा पाण्यामध्येही नाशिककर वाटा मागणार नाही हे कशावरून?जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीदेखील अशीच शंका उपस्थित करून घोषणेच्या आधाराविषयी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने तयार केलेल्या दमणगंगा पिंजाळ लिंक प्रकल्पाच्या अहवालामध्ये मराठवाड्याला पाणी देण्याविषयी काहीच उल्लेख नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी नव्याने अहवाल तयार करावा लागेल.’या प्रकल्पाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वत: मंजुरी दिली असून, तसा प्रस्तावदेखील केंद्राला पाठविला जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.१५० टीएमसीची गरजआजघडीला राज्यात सिंचनाची टक्केवारी २१ असून मराठवाड्यात हेच प्रमाण १८ टक्के आहे. जलसंपदा विभागाकडे असणारी सुमारे ८४ हजार कोटी रुपयांची प्रलंबित कामे अपेक्षेप्रमाणे २०२५ पर्यंत पूर्ण झाल्यावर सिंचन क्षेत्राची टक्केवारी ३७ होणार आहे; परंतु याच वेळी मराठवाड्यात केवळ ७ टक्क्यांची वाढ होऊन सिंचन क्षेत्र २५ टक्के असणार आहे. म्हणजे मराठवाड्यात राज्याच्या तुलनेत १२ टक्क्यांची तूट (सुमारे ७.१२ लाख हेक्टर) निर्माण होणार आहे. ही तूट भरून काढण्यासाठी मराठवाड्याला १५० टीएमसी जादा पाण्याची गरज आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या अभ्यासानुसार या १५० टीएमसी पाण्याची गरज भागविण्यासाठी दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पातून सुमारे ८० टीएमसी पाणी आणावे लागेल. असे असेल तर मराठवाडा कसा सुजलाम्-सुफलाम् होईल?चौकटअसे आणावे लागेल पाणी...राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या अहवालानुसार कोकण खोºयातून १०१० टीएमसी पाणी गोदावरी खोºयामध्ये आणण्यासाठी सुमारे ३८३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ऊर्ध्व पिंजाळमधून उपसापद्धतीने ऊर्ध्व वैतरणामध्ये पाणी टाकण्यासाठी चार धरणांची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्यासाठी ८१७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्पातून गोदावरी खोºयात उपसापद्धतीने पाणी आणण्यासाठी सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च लागेल. त्यासाठी भूगड येथे दमणगंगा नदीवर, खारगीहिल येथे वाघ नदीवर आणि जव्हार येथे पिंजाळ नदीवर धरण बांधले जाणार आहे.कोट५० टीएमसीवर बोळवण का?गुजरातमधील मधुबन प्रकल्पातून दमणगंगेचे ११० टीएमसी पाणी समुद्रात जाऊन मिळते. मग ८० टीएमसीची गरज असताना मराठवाड्याची ५० टीएमसीवर बोळवण का? याविषयी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन वैधानिक विकास मंडळाचे म्हणणे जाणून घ्यावे.- शं. आ. नागरे, तज्ज्ञ सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ