शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दळणवळणासह पायाभूत सुविधांवर भर देणार : इम्तियाज जलील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 19:48 IST

जुन्या खासदाराप्रमाणे मनपात लुडबूड करणार नाही

ठळक मुद्देशहरात शांतता नांदण्यासाठी प्रयत्न केले जाणार नागरिकाची सुरक्षा ही माझी तेवढीच जबाबदारी आहे.

औरंगाबाद : शहरात उद्योगधंदे आणि पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी विमान वाहतूक सेवा, रेल्वे सेवा, दर्जेदार रस्ते, पाणी आदी पायाभूत सोयीसुविधांवर अधिक भर द्यावा लागणार आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मागील २० वर्षांमध्ये विकास कामच झाले नाही. सध्या विकास कामे करण्यासाठी बरीच संधी आहे. शहरात शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.

मागील काही वर्षांपासून औरंगाबादेतील मतदारांना बदल हवा होता. मुस्लिम-दलित मतांशिवायही अनेक नागरिकांनी मला मतदान केले आहे. ज्या विश्वासाने नागरिकांनी मला निवडून दिले त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यात येईल. विमान सेवेची सध्या वाईट अवस्था आहे. मुंबई, दिल्ली, हैदराबादसाठी प्रत्येकी एकच विमान आहे. स्पाईस जेट, इंडिगो कंपन्यांना उद्या दिल्लीत जाऊन विमानसेवा वाढवावी म्हणून निवेदन देणार आहे. रेल्वे दळणवळणाच्या सोयीही कमीच आहेत. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसायचे. नंतर मराठवाड्यावर पुन्हा अन्याय हे ठरलेले आहे. त्यासाठी अगोदरच प्रयत्न करायला हवेत.

शहरी, ग्रामीण भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहरात जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत पाणी आणण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न करण्यात येतील. सध्या येणाऱ्या पाण्याचे लेखापरीक्षण झाले पाहिजे. आठ दिवसांपासून शहराची शांतता भंग करण्यासाठी काही मंडळी प्रयत्न करीत आहेत. भडक वक्तव्य, व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यात येत आहेत. चंद्रकांत खैरे यांनी मोठे भाऊ म्हणून आम्हाला मार्गदर्शन करावे. त्यांनी आदेश द्यावे, त्यांचे उर्वरित कामेही पूर्ण करण्यात येतील. हिंदूंची सुरक्षा करणार असे सांगितल्या जात आहे. मी या जिल्ह्याचा खासदार असून, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही माझी तेवढीच जबाबदारी आहे.

पाणी चोरांवर कारवाई कराशहरात अनधिकृत नळांची संख्या खूप आहे. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोणीही चुकीचे काम करीत असल्यास पोलिसांनीही कारवाई करावी, असेही इम्तियाज जलील यांनी नमूद केले. तुमच्या व्यासपीठावर दंगलीतील आरोपी बसल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून देताच त्यांनी सोयीने उत्तर देण्याचे टाळले. अवैध नळ कनेक्शनवरून राजाबाजार भागात दंगल उसळल्याची आठवणही त्यांना करून देण्यात आली.

रस्त्यांची यादी अंतिम करावी३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी शहरातील रस्त्यांसाठी १२५ कोटी रुपये देण्याचे मान्य केले. मनपा आयुक्तांनी आजपर्यंत यादीच अंतिम केली नाही. महापौरांनी यादीत अत्यावश्यक रस्त्यांचीच नावे टाकावीत. मी मनपाच्या कारभारात पूर्वीच्या खासदाराप्रमाणे अजिबात लुडबूड करणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन