शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

'मराठवाड्याचा तेलंगणमध्ये समावेश करण्याची मागणी तेलंगण सरकारकडे करणार'

By बापू सोळुंके | Updated: May 12, 2023 20:47 IST

रमेश केरे पाटील भेटणार तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना, १४ मेपासून संवाद यात्रा 

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण, सारथीच्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि विद्यार्थी वसतिगृह, अरबी समुद्रातील शिवस्मारक आदींचे प्रलंबित प्रश्नाकडे शासन दुलर्क्ष करीत आहे. राज्य सरकार जर मराठा समाजाला हक्काचे आरक्षण देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगण राज्यात करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्य समन्वय रमेश केरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रमेश केरे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारणे, सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय झाला, परंतु याची अंमलबजावणी नाही. मराठा आरक्षणाचे भविष्य काय आहे, याचे उत्तर राज्यसरकारकडे नाही.मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चाच्या राजकीय समन्वयकांना हाताशी धरून राज्यसरकार समाजाची दिशाभूल करण्याचे काम राज्यसरकार करीत असल्याचा आरोपही केरे पाटील यांनी केला.  स्वातंत्र्यापूर्वी मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा म्हणजे आताच्या तेलंगण राज्याचा भाग होता. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण राज्यसरकार देणार नसेल तर मराठवाड्याचा समावेश तेलंगणमध्ये करावा, अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी लवकरच तेलंगणचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांची भेट घेणार आहे. १४ मेपासून संवाद यात्रा काढणारराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आजही आपला विश्वास आहे. त्यांनी समाजाच्या मागण्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशी मागणी आहे. मात्र ते जर राजकीय समन्वयकांच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करीत असतील तर ती शुद्ध फसवणूक आहे. ही बाब जनतेला सांगण्यासाठी १४ मेपासून मराठवाड्यात संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा