शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

औरंगाबादला मिळणार नवे पालकमंत्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:27 IST

शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार, राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता औरंगाबादचे नवे पालकमंत्री कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात लागलीच सुरू झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार, राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता औरंगाबादचे नवे पालकमंत्री कोण, याची चर्चा राजकीय वर्तुळात लागलीच सुरू झाली आहे.डॉ. सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे रात्री सुपूर्द केला. हा राजीनामा मंजूर झाल्यास औरंगाबादला नवीन पालकमंत्री मिळणार आहे; मात्र उद्धव ठाकरे यांनी राजीनामा फेटाळल्यास काही काळ डॉ. सावंत हेच पालकमंत्री राहण्याचीही शक्यता आहे.मुंबई पदवीधर मतदारसंघात सावंतांऐवजी विलास पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे दुखावलेल्या डॉ. सावंत यांनी तडकाफडकी आरोग्यमंत्रीपदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. डॉ. सावंत यांच्या आमदारपदाचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे मंत्रीपदावर कायम राहण्यासाठी दोन्हीपैकी कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. डॉ. सावंत यांच्या राजीनाम्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात तूर्तास काहीच प्रतिक्रिया उमटलेली नाही; त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यास नवे पालकमंत्री कोण, याकडे लक्ष आहे.

टॅग्स :deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्री