शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जातनिहाय जनगणना केल्यास आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल काय ?

By स. सो. खंडाळकर | Updated: May 3, 2025 12:55 IST

चर्चा तर होणारच:  एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धाचे ढग गडद होत असताना सरकारने हा निर्णय घेऊन कशासाठी मास्टरस्ट्रोक मारला याचीही चर्चा सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचे विशेषत: ओबीसीतून स्वागत होत आहे. ओबीसींकडून ही मागणी सातत्याने केली जात होती. त्यावर छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. एकीकडे भारत - पाकिस्तान युद्धाचे ढग गडद होत असताना सरकारने हा निर्णय घेऊन कशासाठी मास्टरस्ट्रोक मारला याचीही चर्चा सुरू झाली आहे. भाजप सरकार जातनिहाय जनगणनेच्या बाजूने नव्हते. तशी भूमिका जाहीर केली गेली होती. दुसरीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र सातत्याने जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरीत होते. हा निर्णय झाल्याने त्यांनीही त्याचे स्वागत करीत असताना अंमलबजावणी कधी, असा प्रश्न उपस्थित केला आहे. याच अनुषंगाने चर्चा तर होणारच या सदरात घडवून आणलेली ही साधकबाधक चर्चा.

‘खरा पाठपुरावा राहुल गांधी यांचा’कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने हा मुद्दा ऐरणीवर आणला. त्याचा लोकसभेत व लोकसभेबाहेरही पाठपुरावा केला. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन. निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचेही अभिनंदन. पण हा निर्णय फसवा ठरू नये. अनेक वर्षांपासूनची असलेली ही मागणी प्रत्यक्षात पूर्ण झाली पाहिजे. जात निहाय जनगणना होऊन या देशातल्या ओबीसींना, उपेक्षितांना व वंचितांना न्यायाची दारे उघडली गेली पाहिजेत, हीच अपेक्षा आहे.- अतिश पितळे, जिल्हा अध्यक्ष, कॉंग्रेस ओबीसी विभाग, छत्रपती संभाजीनगर

‘उपेक्षित-वंचितांना मूळ प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न’मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत ऐतिहासिक आहे. देशातल्या छोट्या जातींना, वंचित व उपेक्षित जातींना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे. यानिमित्ताने त्यांच्यात सामाजिक परिवर्तन होईल व समरसतेची भावना निर्माण होईल. तसेच त्यांचा आत्मसन्मान व संवर्धन होईल. उपेक्षित व वंचित जातींचा या जनगणनेतून शोध लागेल व सरकारला त्यांचे संरक्षण करता येईल.- संजय केणेकर, विधान परिषद सदस्य, भाजप

हे श्रेय दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनाजातनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. पण याचे खरे श्रेय दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना द्यावे लागेल. ते खासदार झाल्यानंतर २०१० साली १०१ खासदारांची मोट बांधून तत्कालीन सरकारवर जातनिहाय जनगणना करण्याबद्दल दबाव वाढवला होता. आम्ही तर जातनिहाय जनगणनेसाठी १९७८ पासून लढत आहोत. मंडल आयोग लागू झाल्यापासून हा महत्त्वाचा मुद्दा बाजूला गेला. आताच सरकारने हा निर्णय का घेतला, हे गूढ आहे. कारण याच सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून जातनिहाय जनगणना करूच शकत नाही, अशी भूमिका घेतली होती. आताही जनगणना कधी करणार, कशी करणार, याबद्दल स्पष्टता नाही. पहलगाम प्रकरणावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी घेतलेला तर हा निर्णय नाही ना? अशी शंका आहे.: शब्बीर अन्सारी, संस्थापक अध्यक्ष, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन

लढ्याला आता यश आले जातनिहाय जनगणना करा ही सर्वच ओबीसी संघटनांची पूर्वीपासूनचीच मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून वेळोवेळी ओबीसीची निश्चित किती आकडेवारी आहे? अशी विचारणा होत होती. जातनिहाय जनगणनेमुळे ही आकडेवारी मिळाली म्हणजे वंचित घटकांच्या विकास योजनांसाठी धोरण ठरवता येईल. इंद्रा सहानी प्रकरणामुळे पन्नास टक्क्यांपर्यंत असलेली आरक्षण मर्यादा वाढवता येऊ शकेल. तसेच आरक्षणाच्या विषयावर तणाव निर्माण झाला तर सुदर्शन नचिप्पन आयोगानुसार लोकसंख्येवर आधारित आरक्षण धोरणही राबवता येईल. विरोधकांनी केलेल्या अनेक मागण्या सरकार पक्ष स्वीकारत असते. हे पूर्वीपासूनच चालत आले आहे. या विषयावर छत्रपती संभाजीनगरातील ओबीसी संघटनांनी पूर्वीपासूनच दीपस्तंभाप्रमाणे काम केले आहे. तसेच आपल्या ताकदीनुसार वेळोवेळी आंदोलने केली आहेत. त्या लढ्याला आता यश आले आहे, असे वाटते.- महेश निनाळे, निमंत्रक, नॉन पॉलिटिकल ओबीसी, एससी-एसटी, व्हीजेएनटी सोशल फ्रंट, छत्रपती संभाजीनगर

आमचीही मागणी होती....जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ही आमचीही आग्रही मागणी होती. यातून कोणत्या समाजाचे किती लोक हे पुढे येतील, त्यानुसार त्यांना आरक्षण देता येईल. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात तशी आर्थिक तरतूद करून त्या त्या समाजांच्या विकासाच्या योजना राबवता येतील. तसेच सध्या तेच ते असलेले मतदारसंघही बदलतील. सरकारच्या निर्णयाचे स्वागत.- बाबूराव कदम, प्रदेश कार्याध्यक्ष, रिपाइं आठवले गट

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरOBC Reservationओबीसी आरक्षण