शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:49 IST

पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यासह अजिंठ्याच्या डोंगरात पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. उन्हामुळे डोंगर बोडखे झाले असून चोहीकडे पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांना थांबण्यासाठी सावली नाही. डोंगरात पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाच्या नाकात दम आला आहे.मागील आठवड्यात शिरसाळा तांडा परिसरात एका बिबट्याचा अन्न -पाण्याविना तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी वन्यप्राणी रस्त्यावर, गाव वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकून वन विभाग वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर वन्यप्राण्यांची संख्या घटल्यास आश्चर्य वाटू नये.अजिंठा डोंगरात बिबट्या, अस्वल, हरण, मोर, लांडगा, नीलगाय, तडस, पशू पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. सिल्लोड, अजिंठा, सोयगाव वन परिक्षेत्रातील सर्वच जंगलात उन्हामुळे पानगळ झाली आहे. याचा फटका वन्यप्राण्यांना बसला आहे.सिल्लोड वन परिक्षेत्रात १ हजार ५९ हेक्टर, अजिंठा वनपरिक्षेत्रात ९ हजार हेक्टर, सोयगाव ९ हजार हेक्टर असे एकूण १९ हजार हेक्टर परिक्षेत्र आहे. त्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहे. मानवी वस्त्यांकडे आलेल्या अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हरणांचे लचके तोडले आहे. नीलगाय, हरण विहिरीत पडत आहे.३४ कृत्रिम पाणवठ्यात टँकरचे पाणीवन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, यासाठी वन विभागाने सिल्लोड परिक्षेत्रात पिंपळगाव घाट, चिंचवण, शिंदेफळ, धावडा, पळशी परिसरात ५ पाणवठे तयार केले आहेत. अजिंठा वन विभागाने अजिंठा, नाटवी, जळकी, वसई, जामठी, हिंगणा, फर्दापूर, ठाणा, देव्हारीच्या जंगलात २० कृत्रिम पाणवठे तर सोयगाव तालुक्यात ९ पाणवठे तयार केले आहेत. त्यात आता टँकरद्वारे पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वन विभाग करताना दिसत आहे. अजिंठा, सिल्लोड, सोयगाव परिक्षेत्रात एकूण ३४ कृत्रिम पाणवठे तयार केले असून यात टँकरने नियमित पाणी टाकले जात आहे. यामुळे प्राण्यांची तहान काही अंशी भागत आहे, अशी माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दहिवाल, सोयगावचे शिवाजी काळे यांनी दिली. यासाठी दरमहा १ लाख ६३ हजार रुपये पाण्यावर खर्च होत आहे.४ लाख १४ हजार रोपे जगविलीअजिंठ्यात भीषण पाणीटंचाई असताना नर्सरीसाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन अजिंठा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा करून अजिंठा वन विभागाने ४ लाख १४ हजार रोपे जगविली. यामुळे आज ही रोपवाटिका हिरवीगार दिसत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीकपात