शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:49 IST

पाणवठे कोरडेठाक; डोंगरही बोडखे : उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाची दमछाक

श्यामकुमार पुरेसिल्लोड : सिल्लोड तालुक्यासह अजिंठ्याच्या डोंगरात पाण्याअभावी वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. उन्हामुळे डोंगर बोडखे झाले असून चोहीकडे पाण्याचा ठणठणाट आहे. वन्यप्राण्यांना थांबण्यासाठी सावली नाही. डोंगरात पिण्यासाठी पाणी नाही. उन्हाच्या झळांशी सामना करताना वन विभागाच्या नाकात दम आला आहे.मागील आठवड्यात शिरसाळा तांडा परिसरात एका बिबट्याचा अन्न -पाण्याविना तडफडून मृत्यू झाला होता. यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला. पाण्यासाठी वन्यप्राणी रस्त्यावर, गाव वस्तीकडे धाव घेताना दिसत आहेत. कृत्रिम पाणवठ्यात पाणी टाकून वन विभाग वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहे, पण याचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला नाही तर वन्यप्राण्यांची संख्या घटल्यास आश्चर्य वाटू नये.अजिंठा डोंगरात बिबट्या, अस्वल, हरण, मोर, लांडगा, नीलगाय, तडस, पशू पक्षी, सरपटणारे प्राणी आहेत. सिल्लोड, अजिंठा, सोयगाव वन परिक्षेत्रातील सर्वच जंगलात उन्हामुळे पानगळ झाली आहे. याचा फटका वन्यप्राण्यांना बसला आहे.सिल्लोड वन परिक्षेत्रात १ हजार ५९ हेक्टर, अजिंठा वनपरिक्षेत्रात ९ हजार हेक्टर, सोयगाव ९ हजार हेक्टर असे एकूण १९ हजार हेक्टर परिक्षेत्र आहे. त्यातील सर्वच पाण्याचे स्त्रोत आटले आहे. मानवी वस्त्यांकडे आलेल्या अनेक ठिकाणी कुत्र्यांनी हरणांचे लचके तोडले आहे. नीलगाय, हरण विहिरीत पडत आहे.३४ कृत्रिम पाणवठ्यात टँकरचे पाणीवन्यप्राण्यांची भटकंती होऊ नये, यासाठी वन विभागाने सिल्लोड परिक्षेत्रात पिंपळगाव घाट, चिंचवण, शिंदेफळ, धावडा, पळशी परिसरात ५ पाणवठे तयार केले आहेत. अजिंठा वन विभागाने अजिंठा, नाटवी, जळकी, वसई, जामठी, हिंगणा, फर्दापूर, ठाणा, देव्हारीच्या जंगलात २० कृत्रिम पाणवठे तर सोयगाव तालुक्यात ९ पाणवठे तयार केले आहेत. त्यात आता टँकरद्वारे पाणी टाकून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न वन विभाग करताना दिसत आहे. अजिंठा, सिल्लोड, सोयगाव परिक्षेत्रात एकूण ३४ कृत्रिम पाणवठे तयार केले असून यात टँकरने नियमित पाणी टाकले जात आहे. यामुळे प्राण्यांची तहान काही अंशी भागत आहे, अशी माहिती अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे, सिल्लोडचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. आर. दहिवाल, सोयगावचे शिवाजी काळे यांनी दिली. यासाठी दरमहा १ लाख ६३ हजार रुपये पाण्यावर खर्च होत आहे.४ लाख १४ हजार रोपे जगविलीअजिंठ्यात भीषण पाणीटंचाई असताना नर्सरीसाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेऊन अजिंठा मध्यम प्रकल्पातून पाणी उपसा करून अजिंठा वन विभागाने ४ लाख १४ हजार रोपे जगविली. यामुळे आज ही रोपवाटिका हिरवीगार दिसत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी. मांगधरे यांनी दिली.

टॅग्स :forest departmentवनविभागwater shortageपाणीकपात