शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची तहान टँकरवर !

By admin | Updated: July 24, 2015 00:49 IST

बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.

बीड : दुष्काळी स्थितीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. चारा- पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मागील चार महिन्यांपासून टँकरच्या पाण्यावर प्राण्यांची तहान भागविण्याची वेळ वनविभागावर आली आहे.जिल्ह्याचे वनक्षेत्र २२ हजार ९७५ हेक्टर इतके आहे. या वनक्षेत्रात ब्लॅकबप, रानडूकरे, मोर, ससा, तडस, लांडगे, कोल्हे, काळवीट आदी प्राणी वास्तव्यास आहेत. गतवर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे वनक्षेत्रातील चारा, पाणी जूनपर्यंत पुरला नाही. एप्रिल महिन्यातच टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे वनविभागाने प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात केली. वनक्षेत्रामध्ये ६७ कृत्रिम तर २२ नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यामध्ये हे पाणी साठवून ठेवले जात आहे. पाच ते १२ हजार लिटर्स इतकी साठवण क्षमता असलेल्या पाणवठ्यांमध्ये साठविलेल्या पाण्यावर प्राण्यांना तहान भागवावी लागते.टँकरचे पाणी उपलब्ध न झाल्यास वन्यप्राणी पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे धाव घेतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. दरम्यान, टँकरवर महिन्याकाठी ते २५ ते २८ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. गेल्या चार महिन्यांत सव्वा लाख रुपये खर्च झाला असल्याचे उपविभागीय वनाधिकारी आर. आर. काळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)