शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही बस जात नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांची खाजगी वाहनाने शहरात येण्यासाठी धावपळ सुरू असते.

ग्रामीण भागातील आठ तालुक्यांत ५६ बस आहेत. जेमतेम २३ बस सोडण्यात आलेल्या असून, आवश्यकतेनुसारच इतर बस सोडण्यात येणार आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. शहर, ग्रामीण लॉकडाऊन झाल्यामुळे गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच धावते, ग्रामीण भागावर चांगले आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. खेड्यांत कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. शाळादेखील सुरू होण्याच्या मार्गावर असून, बहुतांश शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी बसची आवश्यकता आहे. या मुलांना बसशिवाय शाळेत ये-जा करणे शक्य नाही. त्या बस सुरू झाल्या, तर शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा होईल.

आगारातील एकूण बस - ५००

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १,०००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ७००

खेडेगावांत जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार...

-खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खाजगी वाहनाने, टमटम, कालीपिली, रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या टमटमचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.

सहा हजार कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहरांचाच!

दुसरी लाट ओसरल्यानंतर आगारातील सध्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. शहरालगतच्या आठही तालुक्यांत २३ बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.

खेडेगावांवरच अन्याय का?

-प्रत्येक जण खेड्याला दुय्यम लेखतो, गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.

-सांडू शेळके पाटील (प्रवाशाची प्रतिक्रिया)

-शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा हवा...

कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या असून, दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही.

-संजय जाधव (प्रवासी प्रतिक्रिया)

आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येईल...

सध्या जवळपास सर्वच बस सुरू करण्यात आल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील प्रतिसादानुसार सुरू कराव्या लागणार आहेत.

-अमोल आहिरे, आगार नियंत्रक