शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही बस जात नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांची खाजगी वाहनाने शहरात येण्यासाठी धावपळ सुरू असते.

ग्रामीण भागातील आठ तालुक्यांत ५६ बस आहेत. जेमतेम २३ बस सोडण्यात आलेल्या असून, आवश्यकतेनुसारच इतर बस सोडण्यात येणार आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. शहर, ग्रामीण लॉकडाऊन झाल्यामुळे गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच धावते, ग्रामीण भागावर चांगले आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. खेड्यांत कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. शाळादेखील सुरू होण्याच्या मार्गावर असून, बहुतांश शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी बसची आवश्यकता आहे. या मुलांना बसशिवाय शाळेत ये-जा करणे शक्य नाही. त्या बस सुरू झाल्या, तर शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा होईल.

आगारातील एकूण बस - ५००

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १,०००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ७००

खेडेगावांत जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार...

-खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खाजगी वाहनाने, टमटम, कालीपिली, रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या टमटमचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.

सहा हजार कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहरांचाच!

दुसरी लाट ओसरल्यानंतर आगारातील सध्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. शहरालगतच्या आठही तालुक्यांत २३ बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.

खेडेगावांवरच अन्याय का?

-प्रत्येक जण खेड्याला दुय्यम लेखतो, गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.

-सांडू शेळके पाटील (प्रवाशाची प्रतिक्रिया)

-शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा हवा...

कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या असून, दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही.

-संजय जाधव (प्रवासी प्रतिक्रिया)

आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येईल...

सध्या जवळपास सर्वच बस सुरू करण्यात आल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील प्रतिसादानुसार सुरू कराव्या लागणार आहेत.

-अमोल आहिरे, आगार नियंत्रक