शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच का धावतेय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

साहेबराव हिवराळे औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण ...

साहेबराव हिवराळे

औरंगाबाद : एसटी महामंडळाने लांब पल्ला, रातराणी, आंतरराज्य, मध्यम आणि साध्या बस सुरू केल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात अजूनही बस जात नाहीत. त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांची खाजगी वाहनाने शहरात येण्यासाठी धावपळ सुरू असते.

ग्रामीण भागातील आठ तालुक्यांत ५६ बस आहेत. जेमतेम २३ बस सोडण्यात आलेल्या असून, आवश्यकतेनुसारच इतर बस सोडण्यात येणार आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर बस फेऱ्या बंद करण्यात आल्या. संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली. शहर, ग्रामीण लॉकडाऊन झाल्यामुळे गाव तिथे एसटी फक्त शहरांसाठीच धावते, ग्रामीण भागावर चांगले आहे का, असे म्हणण्याची वेळ आली आहे. खेड्यांत कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला आहे. शाळादेखील सुरू होण्याच्या मार्गावर असून, बहुतांश शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी बसची आवश्यकता आहे. या मुलांना बसशिवाय शाळेत ये-जा करणे शक्य नाही. त्या बस सुरू झाल्या, तर शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा होईल.

आगारातील एकूण बस - ५००

कोरोनाआधी दररोज होणाऱ्या फेऱ्या - १,०००

सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ७००

खेडेगावांत जाण्यासाठी ‘टमटम’चा आधार...

-खेड्यातील नागरिकांना बससेवा कमी असल्यामुळे खाजगी वाहनाने, टमटम, कालीपिली, रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. खासगी वाहनाने प्रवासासाठी अधिकचे पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो; परंतु नाइलाजाने त्या टमटमचा आधार नागरिकांना घ्यावा लागतो.

सहा हजार कि.मी.चा प्रवास; पण फक्त शहरांचाच!

दुसरी लाट ओसरल्यानंतर आगारातील सध्या तीनशे ते साडेतीनशेच्या आसपास बस सुरू झाल्या असून, लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. शहरालगतच्या आठही तालुक्यांत २३ बस धावत असून, उत्पन्न सध्या जेमतेम होत आहे. प्रवासी अद्यापही म्हणावे तेवढ्या प्रमाणात बाहेर निघताना दिसत नाहीत.

खेडेगावांवरच अन्याय का?

-प्रत्येक जण खेड्याला दुय्यम लेखतो, गावातील प्रवाशांना नाइलाजास्तव खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. गाव तिथे एसटी फक्त नावापुरतेच राहिले आहे, असे म्हणावे लागेल.

-सांडू शेळके पाटील (प्रवाशाची प्रतिक्रिया)

-शाळकरी मुलांचा प्रवास सोयीचा हवा...

कोरोनामुळे एसटी बस बंद करण्यात आल्या असून, दुसऱ्या लाटेनंतर अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही.

-संजय जाधव (प्रवासी प्रतिक्रिया)

आवश्यकतेनुसार सुरू करण्यात येईल...

सध्या जवळपास सर्वच बस सुरू करण्यात आल्या असून, संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारी म्हणून टप्प्याटप्प्याने बससेवा सुरळीत करण्यात येईल. शाळा सुरू झाल्यामुळे बसदेखील प्रतिसादानुसार सुरू कराव्या लागणार आहेत.

-अमोल आहिरे, आगार नियंत्रक