शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

भाजपबरोबर जाता मग कम्युनिस्टांबरोबर का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:53 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल.

ठळक मुद्देउद्धव कांबळे : जातीचा प्रश्न वर्गाच्या साच्यात बसवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल. अर्थात मार्क्सवाद्यांनी जातव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेच. त्यांच्या लाख चुका असल्या तरी वर्गसंघर्षातलं त्यांचं सातत्य कुणीही नाकारू शकत नाही. राजकारणात तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता मग कम्युनिस्ट का चालत नाहीत? असा खडा सवाल आज येथे औरंगाबादचे माजी पोलीस आयुक्त उद्धव कांबळे यांनी उपस्थित केला.‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन आणि दिशा’ या आपल्या ग्रंथावरील परिसंवादात प्रा. राहुल कोसंबी व प्रा. उमेश बगाडे यांच्या मांडणीनंतर उद्धव कांबळे हे आपली बाजू मांडत होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीत झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. भगवानराव देशपांडे होते. प्रगतिशील लेखक संघ व लोकवाङ्मयाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रकाशक या नात्याने कॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. ‘जयभीम - लाल सलाम’हा नारा अपघात नव्हे तर तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. टीका झाल्याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा विचार करूनच पुढे जावयाचे आहे, असे ते म्हणाले.जातीची अट हा मोठा अडथळा...उद्धव कांबळे यांनी सांगितले की, वर्ग भान निर्माण करण्यात जातीची अट हा मोठा अडथळा होय, असा अडथळा म्हणजे सवतासुभा व वेगळी ओळख निर्माण करण्याचे राजकारण होय. नुसती राज्यघटना असून चालत नाही, तर तिला संस्थात्मक निर्मितीचं पाठबळ द्यावं लागतं.१८५६ सालानंतरच्या कायद्यांमध्ये काहीही बदल झाला नाही. नोकरशाही व न्याय व्यवस्थेतसुद्धा काही बदल झालेले नाहीत. आज जगभर एक भीषण संकट उभे राहत आहे, ते हिटलरशाहीचं. हे आव्हान वेळीच पेलवलं जाण्याची गरजही कांबळे यांनी प्रतिपादिली. फाळणीच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार झाली. काही मुद्यांवर राज्यघटनेनेही सायलेन्सेस पाळलेली दिसून येते. ते मुद्देही त्यांनी मांडले.कॉ. प्रकाश बनसोड, सुनील उबाळे, धम्मपाल जाधव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण