शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

भाजपबरोबर जाता मग कम्युनिस्टांबरोबर का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:53 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल.

ठळक मुद्देउद्धव कांबळे : जातीचा प्रश्न वर्गाच्या साच्यात बसवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल. अर्थात मार्क्सवाद्यांनी जातव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेच. त्यांच्या लाख चुका असल्या तरी वर्गसंघर्षातलं त्यांचं सातत्य कुणीही नाकारू शकत नाही. राजकारणात तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता मग कम्युनिस्ट का चालत नाहीत? असा खडा सवाल आज येथे औरंगाबादचे माजी पोलीस आयुक्त उद्धव कांबळे यांनी उपस्थित केला.‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन आणि दिशा’ या आपल्या ग्रंथावरील परिसंवादात प्रा. राहुल कोसंबी व प्रा. उमेश बगाडे यांच्या मांडणीनंतर उद्धव कांबळे हे आपली बाजू मांडत होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीत झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. भगवानराव देशपांडे होते. प्रगतिशील लेखक संघ व लोकवाङ्मयाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रकाशक या नात्याने कॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. ‘जयभीम - लाल सलाम’हा नारा अपघात नव्हे तर तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. टीका झाल्याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा विचार करूनच पुढे जावयाचे आहे, असे ते म्हणाले.जातीची अट हा मोठा अडथळा...उद्धव कांबळे यांनी सांगितले की, वर्ग भान निर्माण करण्यात जातीची अट हा मोठा अडथळा होय, असा अडथळा म्हणजे सवतासुभा व वेगळी ओळख निर्माण करण्याचे राजकारण होय. नुसती राज्यघटना असून चालत नाही, तर तिला संस्थात्मक निर्मितीचं पाठबळ द्यावं लागतं.१८५६ सालानंतरच्या कायद्यांमध्ये काहीही बदल झाला नाही. नोकरशाही व न्याय व्यवस्थेतसुद्धा काही बदल झालेले नाहीत. आज जगभर एक भीषण संकट उभे राहत आहे, ते हिटलरशाहीचं. हे आव्हान वेळीच पेलवलं जाण्याची गरजही कांबळे यांनी प्रतिपादिली. फाळणीच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार झाली. काही मुद्यांवर राज्यघटनेनेही सायलेन्सेस पाळलेली दिसून येते. ते मुद्देही त्यांनी मांडले.कॉ. प्रकाश बनसोड, सुनील उबाळे, धम्मपाल जाधव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण