शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजपबरोबर जाता मग कम्युनिस्टांबरोबर का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:53 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल.

ठळक मुद्देउद्धव कांबळे : जातीचा प्रश्न वर्गाच्या साच्यात बसवा

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कल समाजवाद व मार्क्सवादाकडे होताच, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. जात ही तशी रिजिड नसतेच. ती डायल्यूटही होऊ शकते. जात कुठवर कुरवाळत बसणार? जातीचे वर्गीय पातळीवरचे संघटन आवश्यक आहे आणि म्हणून जातीची पूर्वअट घालून मार्क्सवादाकडे पाहणे चुकीचे ठरेल. अर्थात मार्क्सवाद्यांनी जातव्यवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहेच. त्यांच्या लाख चुका असल्या तरी वर्गसंघर्षातलं त्यांचं सातत्य कुणीही नाकारू शकत नाही. राजकारणात तुम्ही भाजपबरोबर जाऊ शकता मग कम्युनिस्ट का चालत नाहीत? असा खडा सवाल आज येथे औरंगाबादचे माजी पोलीस आयुक्त उद्धव कांबळे यांनी उपस्थित केला.‘डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन आणि दिशा’ या आपल्या ग्रंथावरील परिसंवादात प्रा. राहुल कोसंबी व प्रा. उमेश बगाडे यांच्या मांडणीनंतर उद्धव कांबळे हे आपली बाजू मांडत होते. मराठवाडा महसूल प्रबोधिनीत झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉ. भगवानराव देशपांडे होते. प्रगतिशील लेखक संघ व लोकवाङ्मयाने या परिसंवादाचे आयोजन केले होते. प्रकाशक या नात्याने कॉ. भालचंद्र कांगो यांनी प्रारंभी प्रास्ताविक केले. ‘जयभीम - लाल सलाम’हा नारा अपघात नव्हे तर तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न आहे. टीका झाल्याशिवाय क्रांतीचा रथ पुढे जाणार नाही. मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद यांचा विचार करूनच पुढे जावयाचे आहे, असे ते म्हणाले.जातीची अट हा मोठा अडथळा...उद्धव कांबळे यांनी सांगितले की, वर्ग भान निर्माण करण्यात जातीची अट हा मोठा अडथळा होय, असा अडथळा म्हणजे सवतासुभा व वेगळी ओळख निर्माण करण्याचे राजकारण होय. नुसती राज्यघटना असून चालत नाही, तर तिला संस्थात्मक निर्मितीचं पाठबळ द्यावं लागतं.१८५६ सालानंतरच्या कायद्यांमध्ये काहीही बदल झाला नाही. नोकरशाही व न्याय व्यवस्थेतसुद्धा काही बदल झालेले नाहीत. आज जगभर एक भीषण संकट उभे राहत आहे, ते हिटलरशाहीचं. हे आव्हान वेळीच पेलवलं जाण्याची गरजही कांबळे यांनी प्रतिपादिली. फाळणीच्या पार्श्वभूमीवर राज्यघटना तयार झाली. काही मुद्यांवर राज्यघटनेनेही सायलेन्सेस पाळलेली दिसून येते. ते मुद्देही त्यांनी मांडले.कॉ. प्रकाश बनसोड, सुनील उबाळे, धम्मपाल जाधव आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. चळवळीतील कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण