शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; का घेतला शासनाने निर्णय...

By विकास राऊत | Updated: September 22, 2023 20:04 IST

कही खुशी कही गम : राज्यभरासाठी शासकीय निर्णय लागू

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता जिल्हानिहाय जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. याबाबत शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेश येईपर्यंत उपविभागीय पातळीवर बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे तलाठ्यांना सोयीनुसार बदली करून घेणे शक्य होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार गेल्यामुळे कुठे नाराजीचा तर कुठे आनंदाचा सूर उमटत आहे.

जे तलाठी आपापल्या विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. परंतु ज्यांना विभाग बदलून दुसऱ्या विभागात जायचे आहे, त्यांना मात्र या निर्णयामुळे आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर उपविभागातील तलाठ्यांची याच विभागात बदली होत असे. परंतु आता शासन निर्णयामुळे पूर्ण जिल्ह्यात कुठेही बदली होऊ शकते. राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली असता या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे शासनाचा निर्णय.....तलाठी गट क संवर्गाचे नियुक्ती अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. तलाठ्यांची बदली जिल्ह्यात करण्यात येईल. सेवाज्येष्ठतेची सूची जिल्हास्तरावर ठेवण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

का घेतला शासनाने निर्णय.....एक किंवा दोन तालुक्यांत पूर्ण सेवा दिल्यास कामामध्ये सारखेपणा येऊ शकतो. अनेक तलाठी उपविभागाबाहेर बदलीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, उपविभाग पातळीवर ते शक्य होत नाही. तसेच तलाठ्यांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत गुंतागुंत होऊन त्यांचे नुकसान होते. यातून काही प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर तलाठी आस्थापनेचा निर्णय झाल्यास जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग