शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; का घेतला शासनाने निर्णय...

By विकास राऊत | Updated: September 22, 2023 20:04 IST

कही खुशी कही गम : राज्यभरासाठी शासकीय निर्णय लागू

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता जिल्हानिहाय जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. याबाबत शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेश येईपर्यंत उपविभागीय पातळीवर बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे तलाठ्यांना सोयीनुसार बदली करून घेणे शक्य होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार गेल्यामुळे कुठे नाराजीचा तर कुठे आनंदाचा सूर उमटत आहे.

जे तलाठी आपापल्या विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. परंतु ज्यांना विभाग बदलून दुसऱ्या विभागात जायचे आहे, त्यांना मात्र या निर्णयामुळे आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर उपविभागातील तलाठ्यांची याच विभागात बदली होत असे. परंतु आता शासन निर्णयामुळे पूर्ण जिल्ह्यात कुठेही बदली होऊ शकते. राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली असता या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे शासनाचा निर्णय.....तलाठी गट क संवर्गाचे नियुक्ती अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. तलाठ्यांची बदली जिल्ह्यात करण्यात येईल. सेवाज्येष्ठतेची सूची जिल्हास्तरावर ठेवण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

का घेतला शासनाने निर्णय.....एक किंवा दोन तालुक्यांत पूर्ण सेवा दिल्यास कामामध्ये सारखेपणा येऊ शकतो. अनेक तलाठी उपविभागाबाहेर बदलीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, उपविभाग पातळीवर ते शक्य होत नाही. तसेच तलाठ्यांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत गुंतागुंत होऊन त्यांचे नुकसान होते. यातून काही प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर तलाठी आस्थापनेचा निर्णय झाल्यास जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग