शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे; का घेतला शासनाने निर्णय...

By विकास राऊत | Updated: September 22, 2023 20:04 IST

कही खुशी कही गम : राज्यभरासाठी शासकीय निर्णय लागू

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील तलाठ्यांच्या बदल्यांचे अधिकार आता जिल्हानिहाय जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. याबाबत शासनाने दोन दिवसांपूर्वी अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेश येईपर्यंत उपविभागीय पातळीवर बदल्यांचे अधिकार होते. त्यामुळे तलाठ्यांना सोयीनुसार बदली करून घेणे शक्य होते. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पूर्ण अधिकार गेल्यामुळे कुठे नाराजीचा तर कुठे आनंदाचा सूर उमटत आहे.

जे तलाठी आपापल्या विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून आहेत त्यांचा या निर्णयाला विरोध आहे. परंतु ज्यांना विभाग बदलून दुसऱ्या विभागात जायचे आहे, त्यांना मात्र या निर्णयामुळे आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर उपविभागातील तलाठ्यांची याच विभागात बदली होत असे. परंतु आता शासन निर्णयामुळे पूर्ण जिल्ह्यात कुठेही बदली होऊ शकते. राज्य तलाठी महासंघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांना प्रतिक्रिया विचारली असता या निर्णयाचे संमिश्र पडसाद उमटत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे शासनाचा निर्णय.....तलाठी गट क संवर्गाचे नियुक्ती अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. तलाठ्यांची बदली जिल्ह्यात करण्यात येईल. सेवाज्येष्ठतेची सूची जिल्हास्तरावर ठेवण्यात येईल. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सेवा ज्येष्ठतेवर कोणताही परिणाम होणार नाही.

का घेतला शासनाने निर्णय.....एक किंवा दोन तालुक्यांत पूर्ण सेवा दिल्यास कामामध्ये सारखेपणा येऊ शकतो. अनेक तलाठी उपविभागाबाहेर बदलीसाठी प्रयत्न करीत असतात. परंतु, उपविभाग पातळीवर ते शक्य होत नाही. तसेच तलाठ्यांच्या सेवा ज्येष्ठतेबाबत गुंतागुंत होऊन त्यांचे नुकसान होते. यातून काही प्रकरणे न्यायप्रविष्ट झाली आहेत. त्यामुळे जिल्हास्तरावर तलाठी आस्थापनेचा निर्णय झाल्यास जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळू शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादTransferबदलीcollectorजिल्हाधिकारीRevenue Departmentमहसूल विभाग