शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सेनेच्या वाघाने आपल्या गडात एकटे लढवून दाखवावे, मित्रपक्ष कशाला हवेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 12:39 IST

MP Imtiaz Jalil on Shivsena पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू.

ठळक मुद्देमुस्लिमांशिवाय कोणतीही आघाडी देशात शक्य नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढविणार

औरंगाबाद : शिवसेनेने आपल्या गडामध्ये मनपा निवडणूक स्वबळावर लढवून दाखवावी. राज्याच्या आघाडीतील मित्रपक्षांची गरज कशाला पडतेय, अशाप्रकारे एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांनी बुधवारी येथे एका पत्रकार परिषदेत शिवसेनेला डिवचले. धार्मिक स्थळे उघडण्याच्या मुद्द्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे नाव न घेता त्यांच्याकडून होत नसेल तर मी मंदिर उघडून देतो, असा चिमटाही त्यांनी काढला. (  MP Imtiaz Jalil challenges Shivsena )  

महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. २०१५ च्या तुलनेत आणखी मोठ्या संख्येने आमचे उमेदवार निवडून येतील, असा दावा खा. जलील यांनी केला. पाच वर्षांसाठी महापालिकेची सत्ता आमच्या हातात द्यावी, आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवू. सध्या शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत जालना रोडचे काम सुरू आहे. विमानतळासमोर ओव्हर ब्रिज बांधण्यात येणार आहे. त्याला एमआयएमचा विरोध आहे. आकाशवाणी किंवा अमरप्रीत चौकात याची गरज आहे. स्थानिक सर्व आमदारांनीही याला पाठिंबा दर्शविला आहे. प्राधिकरणाने जागा न बदलल्यास थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर आम्ही जाऊन बसणार आहोत. मुकुंदवाडी स्मशानभूमी ते थेट केंब्रिजपर्यंत स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणीही पत्रकार परिषदेत खा. जलील यांनी केली. जालना रोडवरील वक्फ मालमत्ता खरेदी करणारे, विक्री करणारे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. वक्फ बोर्डाचे कर्मचारी चोर नव्हे तर डाकू आहेत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष समीर अब्दुल साजेद, शहराध्यक्ष शारेख नक्षबंदी, माजी नगरसेवक नासेर सिद्दीकी उपस्थित होते.

उत्तर प्रदेश, दिल्लीत लढूशरद पवार यांच्या नवीन राष्ट्रीय आघाडीबद्दल पत्रकारांनी जलील यांना छेडले असता मुस्लिमांशिवाय कोणतीही आघाडी देशात शक्य नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत आम्ही पूर्ण ताकदीने विधानसभा लढविणार असल्याचेही खा. जलील म्हणाले.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनShiv Senaशिवसेना