शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जो येईल त्याला लस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील ...

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्चच्या पहिल्या अथवा दुसर्या आठवड्यात सुरु होणार आहे. या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिकांना डोस देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी अद्यापही नोंदणीची प्रक्रिया सुरु झालेली नाही. या तिसर्या टप्प्यात यावेळी नोंदणीऐवजी जो येईल त्याला लस, अशी पद्धत राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांना आणि दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. यात ३३ हजार आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येत आहे. या दोन्ही टप्प्यातील लसीकरणासाठी लसीच्या लाभार्थ्यांची नावे को-विन अ‍ॅपवर अपलोड करावी लागली. ऑनलाइन पद्धतीनेच लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. यामध्ये बर्याच अडचणी येत आहे. लसीकरणाचा संदेश लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची स्थिती आहे. अ‍ॅप संथगतीने चालत असल्याने लसीकरणाची प्रक्रियाही संथ होते. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लाभार्थ्यांची संख्या मर्यादित आहे. तिसर्या टप्प्यात मात्र ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. त्यांची संख्याही अधिक राहणार आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यासाठी कोणतीही नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली नाही. तिसर्या टप्प्यात लसीकरणासाठी जागेवरच नोंदणी करून डोस देण्याचा विचार आरोग्य यंत्रणेकडून सुरु आहे. त्यावर लवकरच शिक्कमोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लसीकरणाचे केंद्र वाढणार

लसीकरणाचे केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले. लसीकरणाचा तिसरा टप्पा ६ मार्चनंतर सुरु होईल. यात ५० वर्षांवरील लोकांना लस देण्यात येणार आहे. तोपर्यंत लस साठविण्याची क्षमतेतही वाढ होईल, असे आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले.