शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

१०० कोटींच्या निविदांचा ‘विलंबकार’ कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:48 IST

१०० कोटींच्या रस्त्यांमध्ये मागील अनेक दिवसांमध्ये असंख्य विघ्न निर्माण झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने तीन महिन्यांपूर्वी औरंगाबाद महापालिकेला रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान मंजूर केले. या निधीतून किती निविदा काढायच्या याचा निर्णय आयुक्तांनी घ्यावा, असा स्पष्ट निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी महापालिकेला दिला. त्यानंतरही निविदा काढण्यास प्रशासनाकडून विलंब लावण्यात येत आहे. नगरविकास विभागाचा अभिप्राय घेण्याचा विचार मनपाने सुरू केला आहे.१०० कोटींच्या रस्त्यांमध्ये मागील अनेक दिवसांमध्ये असंख्य विघ्न निर्माण झाले आहेत. महापौर बापूघडमोडे यांच्या कार्यकाळात रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन होऊ नये यासाठी प्रशासन आणि काही पदाधिका-यांनी चंग बांधला आहे. मागील महिन्यातच शासनाने ३१ रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिली. त्यानंतर निविदेच्या अटी व शर्थी ठरविण्यासाठी मनपा प्रशासनाने एक महिन्याचा वेळ वाया घालविला. सोबतच २५ कोटींच्या चार निविदा काढाव्यात किंवा नाही, या मुद्यावर खल सुरू झाला.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांचा यावर अभिप्राय घेण्यात आला. सचिवांनी यासंदर्भात आयुक्तांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असा अभिप्राय दिला. त्यानंतरही मनपाने निविदा काढल्या नाहीत.भाजपच्या काही पदाधिका-यांनी सोमवारी तातडीने मुंबई गाठली. मंत्रालयातील संबंधित अधिका-यांनी १०० कोटींच्या निधीत अद्याप निविदा न काढल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. आतापर्यंत कामे सुरू करायला हवी होती अशी सूचनाही त्यांनी पदाधिका-यांना केली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब गेल्यास परिणाम गंभीर होतील, असा इशाराही अधिकाºयांनी मनपा पदाधिका-यांना दिल्याचे कळते.विद्यमान महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची धडपडसुरू आहे; मात्र मनपा प्रशासनयात अजिबात रस घेण्यास तयार नाही.