शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोणता झेंडा घेऊ हाती...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 02:46 IST

मतदारांची लागणार कसोटी : गावित अनुभवी, वनगांना सहानुभूती तर जाधवांकडे शहरी मतदार

पालघर : लोकसभा पोट निवडणुकीतील विजयी उमेदवाराला जेमतेम वर्षभराचा कालावधी मिळणार असल्याने कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास आपल्या समस्या सुटू शकतील याबाबतीत मतदारांमध्ये संभ्रम आहे. पालघर पोट निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामू शिंगडा तर बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव या प्रमुख पक्षासह सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून भाजप-शिवसेना-बविआ या तीन पक्षांमध्ये विजयासाठी चढाओढ सुरु आहे. एवढे होऊनही निवडूण येणाऱ्या उमेदवाराला अवघा एक वर्षाचा कार्यकाळ मिळणार असल्याने आपली किती कामे होतील असा जनतेचा प्रश्न असल्याने ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी काहीशी अवस्था त्यांची आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, तारापूर औद्ययोगिक मंडळातील सीईटीपी, घनकचरा प्रश्न, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रेल्वे प्रश्न, विना अनुदानित शाळांचा प्रश्न, किनारपट्टीवरील तुटलेले धूप प्रतिबंधक बंधारे, डिझेलचा परतावा, वसई-उत्तन व पालघर-डहाणू दरम्यान मच्छिमारांचा हद्दीचा वाद, दलालांकडून मच्छिमारांची होणारी लूट,अद्यायावत रु ग्णालयाची कमतरता आदी प्रश्न महत्वाचे असल्याने अनुभवी आणि सत्ता पक्षात असणारा व्यक्ती या प्रश्नांना न्याय देईल की नवखा व्यक्ती असा प्रश्नही चर्चेचा बनला आहे.राजेंद्र गावित सत्ताधारी पक्षाचे उमेदवार असून बविआचे उमेदवार बळीराम जाधव याना केंद्रातील कामकाजाचा अनुभव असला तरी बविआ पक्षाला आपल्या मर्यादा असल्याने वरील प्रश्नांवर उपाययोजना आखण्याबाबत वर्षभराचा कालावधी त्यांना अपुरा पडू शकतो. दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांना केंद्रातील कामकाजाचा तसूभरही अनुभव नसल्याने त्यांना हे कामकाज शिकून घेण्यातच मोठा कालावधी निघून जाणार असे चित्र आहे. त्यामुळे आपले प्रलंबित असलेले या प्रश्नांवर वर्षाभरात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणारा उमेदवार निवडून द्यावा असा कल मतदारांत वाढत आहे.ही आहे जमेची बाजूगावितांची काम करण्याची क्षमता तसेच त्यांनी जिल्ह्यात केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहेच. त्याचबरोबरीने समाजाशी त्यांची असलेली नाळ खूप मोठी असून त्याचा फायदा मतदारांकडून त्याना होऊ शकतो. तर दिवंगत चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना सहानुभूतीच्या लाटेचा फायदा मिळू शकतो. तसेच बविवाचे उमेदवार अनुभवि असून त्यांना शहरी भागातून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018