शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाचा पदवीधर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र आहे काय ; पूर्ण पीठ घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:03 IST

मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय यावर ही घेणार निर्णय औरंगाबाद : मुळात ...

मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय यावर ही घेणार निर्णय

औरंगाबाद : मुळात १२ वी नापास असलेला परंतु मुक्त विद्यापीठांमधून बी. कॉम. ची पदवी प्राप्त केलेला उमेदवार विधी शाखेच्या (एल.एल. बी.) प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र आहे काय, तसेच मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय, असे भावी वकिलांच्या शैक्षणिक पात्रतेचे निकष ठरविणारे महत्त्वाचे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान आले.

असे विद्यार्थी प्रवेशास पात्र तसेच अपात्र असल्याबाबत उच्च न्यायालयाचे पूर्ण पीठ, खंडपीठ आणि राष्ट्रीय वकील परिषदेचे परस्पर विरोधी निवाडेही सुनावणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी न्या. रवींद्र घुगे आणी न्या. एस. जी. मेहरे यांनी ही याचिका पूर्णपीठाकडे वर्ग करण्याचा आदेश २० ऑगस्टला दिला आहे.

वैजापूर तालुक्यातील लासूर येथील विष्णू रंभाजी हरिश्चंद्रे या विद्यार्थ्याने ॲड. राहुल आर. करपे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार १९९२ साली विष्णू एस. एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कला शाखेच्या ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता परंतु तो नापास झाला होता. त्यानंतर मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून, २००८ साली त्याने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. कॉम. पदवी प्राप्त केली. तो पदवीधर असला तरी १२ वी नापास असल्यामुळे औरंगाबादेतील मा. प. विधी महाविद्यालयाने एल. एल. बी. च्या प्रथम वर्षास प्रवेश नाकारल्यामुळे खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

चौकट

परस्पर विरोधी निवडे

१. कोणताही पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने २०१८ साली दिला आहे.

२.मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा २०१९ साली दिला होता.

३. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारकाने क्रमिक (सिक्वेन्शल) १० २ ३ अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्यामुळे तो

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र नसल्याचा निवाडा २०१८ साली दिला होता.

४. अखिल भारतीय वकील परिषदेच्या प्रवेश नियम ५ नुसार एच. एस. सी. (१२ वी) १० २ उत्तीर्ण असला तरच विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असतो.