शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मुक्त विद्यापीठाचा पदवीधर विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र आहे काय ; पूर्ण पीठ घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:03 IST

मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय यावर ही घेणार निर्णय औरंगाबाद : मुळात ...

मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय यावर ही घेणार निर्णय

औरंगाबाद : मुळात १२ वी नापास असलेला परंतु मुक्त विद्यापीठांमधून बी. कॉम. ची पदवी प्राप्त केलेला उमेदवार विधी शाखेच्या (एल.एल. बी.) प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र आहे काय, तसेच मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम बारावीच्या समकक्ष आहे काय, असे भावी वकिलांच्या शैक्षणिक पात्रतेचे निकष ठरविणारे महत्त्वाचे प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर सुनावणी दरम्यान आले.

असे विद्यार्थी प्रवेशास पात्र तसेच अपात्र असल्याबाबत उच्च न्यायालयाचे पूर्ण पीठ, खंडपीठ आणि राष्ट्रीय वकील परिषदेचे परस्पर विरोधी निवाडेही सुनावणी दरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे प्रवेशाबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी न्या. रवींद्र घुगे आणी न्या. एस. जी. मेहरे यांनी ही याचिका पूर्णपीठाकडे वर्ग करण्याचा आदेश २० ऑगस्टला दिला आहे.

वैजापूर तालुक्यातील लासूर येथील विष्णू रंभाजी हरिश्चंद्रे या विद्यार्थ्याने ॲड. राहुल आर. करपे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार १९९२ साली विष्णू एस. एस.सी. उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने कला शाखेच्या ११ वी मध्ये प्रवेश घेतला होता परंतु तो नापास झाला होता. त्यानंतर मुक्त विद्यापीठाचा प्रवेश पूर्व तयारीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून, २००८ साली त्याने नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी. कॉम. पदवी प्राप्त केली. तो पदवीधर असला तरी १२ वी नापास असल्यामुळे औरंगाबादेतील मा. प. विधी महाविद्यालयाने एल. एल. बी. च्या प्रथम वर्षास प्रवेश नाकारल्यामुळे खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

चौकट

परस्पर विरोधी निवडे

१. कोणताही पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा मद्रास उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने २०१८ साली दिला आहे.

२.मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्यपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारक विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असल्याचा निवाडा २०१९ साली दिला होता.

३. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मुक्त विद्यापीठाचा पदवीधारकाने क्रमिक (सिक्वेन्शल) १० २ ३ अभ्यासक्रम पूर्ण केला नसल्यामुळे तो

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र नसल्याचा निवाडा २०१८ साली दिला होता.

४. अखिल भारतीय वकील परिषदेच्या प्रवेश नियम ५ नुसार एच. एस. सी. (१२ वी) १० २ उत्तीर्ण असला तरच विद्यार्थी विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास पात्र असतो.