बीड : उन्हाळी सुट्यानंतर सोमवारपासून शाळा पूर्ववत सुरू होत आहेत. शाळा प्रवेशोत्सव हा नाविण्यपूर्ण प्रयोग यावेळी राज्याच्या शिक्षण विभागामार्फत राबविला जात आहे. त्याअंतर्गत जिल्हा परिषदेने शनिवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना शाळांमध्ये मुक्कामी थांबून प्रवेशोत्सवाचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. काही ठिकाणी अधिकारी मुक्कामी होते मात्र, काही गावांमध्ये केवळ हजेरी लावून परतले.‘लोकमत’ने प्रवेशोत्सवाच्या अनुषंगाने केलेल्या स्टींगदरम्यान ही माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ नामदेव ननावरे यांनी २५ जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना शाळांच्या नावासह मुक्कामी राहण्याचे आदेश १२ जून रोजी दिले होते. ननावरे हे स्वत: धर्मापुरी (ता. परळी) येथील जि. प. माध्यमिक शाळेत मुक्कामी राहिले. त्यांनी शाळेच्या समस्या जाणून घेत प्रवेशाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी ग्रामस्थांशी चर्चा करून गुणवत्तावाढीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अंबाजोगाई, परळी, आष्टी येथे अधिकारी आढळून आले.शिक्षणाधिकारी भुर्रर्र....शिक्षणाधिकारी (प्रा) सुखदेव सानप यांना हिंगणी (ता. धारूर) शाळा दिली होती. मात्र, बैठकीसाठी रविवारी रात्री ते मुंबईला रवाना झाले. बैठक महत्त्वाची असल्यामुळे जावे लागले, परतल्यावर शाळेला भेट देणार आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.या शाळांमध्ये नव्हते अधिकारीमाजलगाव तालुक्यातील रेणापूरी, खालापुरी, शेलापुरी, केसापुरी, नागडगाव, गेवराई तालुक्यातील चकलांबा, धोंडराई, पाटोदा तालुक्यातील थेरला, सौताडा येथे रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अधिकारी नव्हते. (प्रतिनिधींकडून)सीईओ नामदेव ननावरे यांनी मुलांची शाळेबद्दलची भीती दूर व्हावी व शैक्षणिक वातावरण गावागावात तयार व्हावे यासाठी प्रवेशोत्सव आयोजित केला होता.४त्याअंतर्गत अधिकारी, कर्मचाऱ्यांना शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी दिवसभर गावात थांबून प्रवेशाचे नियोजन करावयाचे होते.४शिवाय रात्री शाळेतच मुक्कामी थांबून विद्यार्थ्यांच्या स्वागताची तयारी करायची होती.ंशाळा प्रवेशोत्सवाचे आधीच नियोजन केले होते. काही अधिकारी मुक्कामी गेले नसतील तर माहिती मागविली जाईल. बीईओंना सक्त सूचना दिल्या होत्या. शाळा मुक्कामाचा हा पहिलाच प्रयोग आहे. काही त्रुटी असतील तर त्या दुरूस्त केल्या जातील.- नामदेव ननावरे, सीईओ, बीडरविवारी काही गावांमध्ये अधिकारी दिवसभर होते. तेथील शैक्षणिक अडी-अडचणी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला. शिक्षक शाळेला दांड्या मारतात, संगणक बंद, शौचालयाचा अभाव, खिचडी यासह इतर समस्यांचा समावेश होता. परळी तालुक्यातील नागापूर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला रविवारी रात्री साडेनऊपर्यंत कुलूप होते. केवळ दाराजवळच्या फळ्यावर प्रवेशोत्सव असे लिहून सोपस्कार पार पाडला होता.
कुठे मुक्काम, कुठे दांडी
By admin | Updated: June 15, 2015 00:09 IST