शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
4
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
5
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
6
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
7
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
8
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
9
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
10
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
11
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
12
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
13
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
14
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
15
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
16
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
17
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
18
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
19
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
20
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग

कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:14 IST

घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहेजालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जालना रोडवरून सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोरील वाहने कधी अचानक वळण घेतात, तर कधी वाहतूक सिग्नलमुळे ब्रेक मारावा लागतो.  सिग्नलवर वाहनचालक रस्ता देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु वाहनांच्या रांगेत तेही अशक्य होते. अशा सगळ्या अडथळ्यांना पार करत चिकलठाणा येथील  जिल्हा रुग्णालयापासून घाटीत पोहोचताना ११ कि.मी.च्या अंतरासाठी ३२ मिनिटांचा कालावधी रुग्णवाहिकेला लागतो.

शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील वाहतूक कोंडीच्या ब्लाॅकेजचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे. घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते. चिकलठाणा ते घाटी या अंतरासाठी किती वेळ लागतो आणि रुग्णवाहिका चालकांना या रस्त्यावर कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, याची ‘लोकमत’ ने पडताळणी केली.

मुंबईत लोकलमध्ये बसल्याशिवाय पर्याय नाही, तसेच औरंगाबादकरांना जालना रोडवर आल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते. परंतु गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहे. प्रत्येक चौकात वाहनास  वाहतूक कोंडीत अडकावे लागते. रुग्णवाहिकेत जीवनाशी लढा देत असलेल्या रुग्णांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. अपघात, हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, ब्रेन हॅमरेज अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यांना रुग्णालयात वेळेत नेण्यासाठी रुग्णवाहिकांमधून नेले जाते, परंतु जालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. रुग्णवाहिका सहज जाऊ शकतील, यासाठी उपाययोजनांची गरज आहे,  असे चालक किरण रावल म्हणाले. 

१० चौकांतून प्रवासजिल्हा रुग्णालयासमोरून निघाल्यानंतर घाटीत पोहोचेपर्यंत १० चौक पार करावे लागले. प्रत्येक चौकात रस्त्याच्या कधी डाव्या, तर उजव्या बाजूने वळण घेणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा वेग कमी करावा लागला. दुचाकी, चारचाकी चालक रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु सिग्नल सोडल्याशिवाय रुग्णवाहिका पुढे जाऊच शकत नसल्याची स्थिती आहे.

संपूर्ण रस्त्यावर वाहनेसिग्नल सुटल्यानंतर सर्वात पुढे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत वाहने उभी केली जातात. उजव्या बाजूने पुढे जायचे ठरविले तरीही समोरील वाहने गेल्याशिवाय तेदेखील अशक्य होते. रुग्णवाहिका आल्यानंतर वाहतूक माेकळी करून देण्यासाठी धावपळ उडत असल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा