शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

कुठंय ग्रीन कॅरिडोर ? रुग्णवाहिकेला ११ कि.मी.साठी लागली ३२ मिनिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 18:14 IST

घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहेजालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : जालना रोडवरून सायरन वाजवित जाणाऱ्या रुग्णवाहिकेसमोरील वाहने कधी अचानक वळण घेतात, तर कधी वाहतूक सिग्नलमुळे ब्रेक मारावा लागतो.  सिग्नलवर वाहनचालक रस्ता देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु वाहनांच्या रांगेत तेही अशक्य होते. अशा सगळ्या अडथळ्यांना पार करत चिकलठाणा येथील  जिल्हा रुग्णालयापासून घाटीत पोहोचताना ११ कि.मी.च्या अंतरासाठी ३२ मिनिटांचा कालावधी रुग्णवाहिकेला लागतो.

शहराची लाईफलाईन असलेल्या जालना रोडवरील वाहतूक कोंडीच्या ब्लाॅकेजचा रुग्णवाहिकांनाही फटका बसत आहे. घाटीसह खाजगी रुग्णालयांत जाण्यासाठी जालना रोडवरून रुग्णवाहिकेला जावेच लागते. चिकलठाणा ते घाटी या अंतरासाठी किती वेळ लागतो आणि रुग्णवाहिका चालकांना या रस्त्यावर कोणत्या अडचणीला सामोरे जावे लागते, याची ‘लोकमत’ ने पडताळणी केली.

मुंबईत लोकलमध्ये बसल्याशिवाय पर्याय नाही, तसेच औरंगाबादकरांना जालना रोडवर आल्याशिवाय पर्याय नाही. प्रत्येकाला जालना रोडवर यावेच लागते. परंतु गेल्या काही वर्षांत वाढलेल्या वाहतुकीने या रस्त्यावर सर्वसामान्यांना चालणेही अवघड होत आहे. प्रत्येक चौकात वाहनास  वाहतूक कोंडीत अडकावे लागते. रुग्णवाहिकेत जीवनाशी लढा देत असलेल्या रुग्णांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच न केलेली बरी. अपघात, हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, ब्रेन हॅमरेज अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यांना रुग्णालयात वेळेत नेण्यासाठी रुग्णवाहिकांमधून नेले जाते, परंतु जालना रोडवर रुग्णवाहिकांना वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. रुग्णवाहिका सहज जाऊ शकतील, यासाठी उपाययोजनांची गरज आहे,  असे चालक किरण रावल म्हणाले. 

१० चौकांतून प्रवासजिल्हा रुग्णालयासमोरून निघाल्यानंतर घाटीत पोहोचेपर्यंत १० चौक पार करावे लागले. प्रत्येक चौकात रस्त्याच्या कधी डाव्या, तर उजव्या बाजूने वळण घेणाऱ्या वाहनांमुळे रुग्णवाहिकेचा वेग कमी करावा लागला. दुचाकी, चारचाकी चालक रस्ता मोकळा करून देण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु सिग्नल सोडल्याशिवाय रुग्णवाहिका पुढे जाऊच शकत नसल्याची स्थिती आहे.

संपूर्ण रस्त्यावर वाहनेसिग्नल सुटल्यानंतर सर्वात पुढे जाण्यासाठी रस्त्याच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यापर्यंत वाहने उभी केली जातात. उजव्या बाजूने पुढे जायचे ठरविले तरीही समोरील वाहने गेल्याशिवाय तेदेखील अशक्य होते. रुग्णवाहिका आल्यानंतर वाहतूक माेकळी करून देण्यासाठी धावपळ उडत असल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षा