शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
3
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
4
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
5
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
6
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
7
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
8
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
9
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
10
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
11
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
12
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
13
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
14
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
15
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
16
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
17
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
18
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
19
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
20
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:01 IST

परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यातील विविध शहरांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनची नीट, जेईई, एमपीएससीसह महाविद्यालयीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षांसाठी ग्रामीण भागात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असणारी शेकडो वसतिगृहे कोविड-१९ सेवेसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमधील अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याचा निर्णय आठवड्यात सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. याविषयी राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये कायद्याची लढाई सुरू आहे. परीक्षा घेण्यावर यूजीसी ठाम असल्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.याशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर, आयआयटीतील प्रवेशासाठीची जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, एमपीएससीची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीचाही निर्णय आॅगस्टच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. काही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.अशी सर्व परिस्थिती असताना कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, महाविद्यालये कोविड-१९ च्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. समाजकल्याणसह इतर शासकीय वसतिगृहे १०० टक्के अधिग्रहित आहेत. त्यामुळे गावी परतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात येणार असतील तर त्यांनी राहयचे कुठे, असा प्रश्न आहे.शासनाने अद्यापतरी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे परीक्षांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.>कुठे आणि किती शैक्षणिक वास्तू केल्या अधिग्रहितकोरोनाबाधितांवर उपचार, विलगीकरण आणि क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहित केलेले शाळा आणि वसतीगृहांची शहरनिहाय आकडेवारी... कोल्हापूर १६, नागपूर २, उस्मानाबाद ३५, सांगली ५, नाशिक २५, अमरावती २४, वाशिम १३, मुंबई ३५, सातारा २०, रत्नागिरी ७४७ शाळा, पुणे २२, नंदुरबार ६, ठाणे ४, यवतमाळ २६, जळगाव ७, अहमदनगर १८, बीड ११, जालना ११ तर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील ३५ वसतिगृहे, महाविद्यालयांचा समावेश आहे.