शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:01 IST

परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यातील विविध शहरांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनची नीट, जेईई, एमपीएससीसह महाविद्यालयीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षांसाठी ग्रामीण भागात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असणारी शेकडो वसतिगृहे कोविड-१९ सेवेसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमधील अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याचा निर्णय आठवड्यात सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. याविषयी राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये कायद्याची लढाई सुरू आहे. परीक्षा घेण्यावर यूजीसी ठाम असल्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.याशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर, आयआयटीतील प्रवेशासाठीची जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, एमपीएससीची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीचाही निर्णय आॅगस्टच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. काही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.अशी सर्व परिस्थिती असताना कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, महाविद्यालये कोविड-१९ च्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. समाजकल्याणसह इतर शासकीय वसतिगृहे १०० टक्के अधिग्रहित आहेत. त्यामुळे गावी परतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात येणार असतील तर त्यांनी राहयचे कुठे, असा प्रश्न आहे.शासनाने अद्यापतरी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे परीक्षांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.>कुठे आणि किती शैक्षणिक वास्तू केल्या अधिग्रहितकोरोनाबाधितांवर उपचार, विलगीकरण आणि क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहित केलेले शाळा आणि वसतीगृहांची शहरनिहाय आकडेवारी... कोल्हापूर १६, नागपूर २, उस्मानाबाद ३५, सांगली ५, नाशिक २५, अमरावती २४, वाशिम १३, मुंबई ३५, सातारा २०, रत्नागिरी ७४७ शाळा, पुणे २२, नंदुरबार ६, ठाणे ४, यवतमाळ २६, जळगाव ७, अहमदनगर १८, बीड ११, जालना ११ तर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील ३५ वसतिगृहे, महाविद्यालयांचा समावेश आहे.