शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रहायचे कोठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 03:01 IST

परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

राम शिनगारेऔरंगाबाद : राज्यातील विविध शहरांमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनची नीट, जेईई, एमपीएससीसह महाविद्यालयीन परीक्षा घ्याव्या लागणार आहेत. या परीक्षांसाठी ग्रामीण भागात परतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात यावे लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असणारी शेकडो वसतिगृहे कोविड-१९ सेवेसाठी अधिग्रहित केली आहेत. त्यामुळे परीक्षेसाठी आलेले विद्यार्थी कोठे राहणार, हा प्रश्न उपस्थित होणार आहेत. यातून विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांमधील अंतिम सत्राच्या परीक्षा होणार की नाही, याचा निर्णय आठवड्यात सर्वोच्च न्यायालय देण्याची शक्यता आहे. याविषयी राज्य शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये कायद्याची लढाई सुरू आहे. परीक्षा घेण्यावर यूजीसी ठाम असल्यामुळे परीक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.याशिवाय वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट परीक्षा १३ सप्टेंबर, आयआयटीतील प्रवेशासाठीची जेईई परीक्षा १ ते ६ सप्टेंबर, एमपीएससीची परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या सीईटीचाही निर्णय आॅगस्टच्या अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. काही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.अशी सर्व परिस्थिती असताना कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरातील बहुतांश शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे, महाविद्यालये कोविड-१९ च्या सेवेसाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहेत. समाजकल्याणसह इतर शासकीय वसतिगृहे १०० टक्के अधिग्रहित आहेत. त्यामुळे गावी परतलेले विद्यार्थी परीक्षेसाठी शहरात येणार असतील तर त्यांनी राहयचे कुठे, असा प्रश्न आहे.शासनाने अद्यापतरी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे परीक्षांचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागण्याची चिन्हे आहेत.>कुठे आणि किती शैक्षणिक वास्तू केल्या अधिग्रहितकोरोनाबाधितांवर उपचार, विलगीकरण आणि क्वारंटाईन करण्यासाठी अधिग्रहित केलेले शाळा आणि वसतीगृहांची शहरनिहाय आकडेवारी... कोल्हापूर १६, नागपूर २, उस्मानाबाद ३५, सांगली ५, नाशिक २५, अमरावती २४, वाशिम १३, मुंबई ३५, सातारा २०, रत्नागिरी ७४७ शाळा, पुणे २२, नंदुरबार ६, ठाणे ४, यवतमाळ २६, जळगाव ७, अहमदनगर १८, बीड ११, जालना ११ तर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील ३५ वसतिगृहे, महाविद्यालयांचा समावेश आहे.