शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

By राम शिनगारे | Updated: April 25, 2024 19:40 IST

पीपल्स मेनिफेस्टो: मराठवाडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचा शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी अस्तित्वातील शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासह एम्स, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, ट्रीपल आयटीसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संस्था सुरू झाल्या पाहिजेत. २०१४ साली आयआयएम छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन करण्याचा निर्णय झाला होता; मात्र, राजकीय पाठबळाअभावी ही संस्था नागपूरला स्थलांतरित झाली. सक्षम राजकीय नेतृत्वाच्या अभावी मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण कायम राहिले असल्याचे दिसून येते.

मराठवाडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास आहे. स्वातंत्र्यानंतर या भागात शिक्षणासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षणसंस्था सुरू केली. मात्र, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला तरीही मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरचा शैक्षणिक अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहेत. या सार्वजनिक विद्यापीठांची काही उपकेंद्रेही उभारली आहेत. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत सक्षम बनवलेले नाही. या संस्था सक्षम बनविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्तीच राजकीय नेत्यांनी आतापर्यंत दाखवली नाही. त्यातच मागासलेपणा दूर करण्यासाठी आयआयटी, आयआयएम, ट्रीपल आयटी, एनआयटी, नायपर, केंद्रीय विद्यापीठांसारख्या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शिक्षणसंस्था मराठवाड्यात स्थापन करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात येते. २०१४ साली आयआयएम संस्थेची स्थापना छत्रपती संभाजीनगरात होणार होती. मात्र, ऐनवेळी ही संस्था नागपूरला पळवून नेली. सक्षम राजकीय नेतृत्व, इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील रखडलेले शैक्षणिक प्रकल्पमराठवाड्यात स्थापन होणारी आयआयएम संस्था नागपूरला गेल्यानंतर स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर (एसपीए) संस्था छत्रपती संभाजीनगरात स्थापन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यास १० वर्ष उलटले तरी निर्णय झालाच नाही. छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठासाठी जमीन शोधली होती. त्यानंतर हे विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले. मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन होणार होते, मात्र ते शेवटी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ऋधिपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पैठण येथे संतपीठ सुरू करण्यात आले, मात्र शासनाने अद्यापपर्यंत निधीच दिलेला नाही. विद्यापीठाच्या फंडातून तात्पुरते संतपीठ सुरू आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक निधी शासनाकडून वेळेवर उपलब्ध होत नाही. स्पाेर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) चे विभागीय केंद्रही पळविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू झालेला आहे.

सर्वाधिक खासगी संस्थांच्या शाळामराठवाड्यात राज्यातील सर्वाधिक खासगी शिक्षणसंस्थांच्या शाळा कार्यरत आहेत. मात्र, या संस्था सक्षम बनविण्यासाठी २००४ पासून शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. एवढेच काय शिक्षकेतर अनुदानही २००४ पासून बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठवाड्याचा प्राथमिक शिक्षणाचाही मोठा अनुशेष कायम राहिला आहे.

सरकारी नोकरीतील प्रमाण अत्यल्पलोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यातील तरुणांचे सरकारी नोकरीतील प्रमाण १६ टक्के एवढे असायला पाहिजे. मात्र सद्यस्थितीत हे प्रमाण फक्त ४ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे मराठवाड्यात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना करावी लागेल. तसेच नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठीही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४