शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजला एमआयडीसीचे पाणी कधी मिळणार?; निविदा मंजुरीलाच लागले वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:23 IST

वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.  

ठळक मुद्देवाळूजला एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापासून हा प्रस्ताव अडगळीत पडला होता.

औरंगाबाद : वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे.  

वाळूजला एमआयडीसीकडून वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर दप्तर दिरंगाईमुळे वर्षभरापासून हा प्रस्ताव अडगळीत पडला होता. ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेने वाढीव पाणीपुरवठा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली. प्रशासकीय मान्यतेनंतर निविदा मंजूर होण्याची प्रतीक्षा ग्रामपंचायतीला करावी लागली. नवीन जलवाहिनी व जलकुंभ उभारण्यासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. यापूर्वीची पाच कोटींची राष्ट्रीय पेयजल योजना कुचकामी ठरल्यानंतर ग्रामपंचायतीने एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयडीसीकडून वाळूजला दररोज १४ लक्ष घनमीटर पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे; मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता गावात प्रत्यक्षात शुद्ध पाणीपुरवठा केव्हा होणार, असा सवाल उपस्थित होतो. 

महिनाभरात पाणीपुरवठ्याचा ग्रामपंचायतीचा दावा

सरपंच सुभाष तुपे व ग्रामविकास अधिकारी एस.सी. लव्हाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक अडचणी व निविदा प्रकियेमुळे एमआयडीसीकडून पाणीपुरवठा झाला नसल्याची कबुली दिली. आता प्रशासकीय मंजुरी व निविदाही मंजूर झाल्यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम तात्काळ सुरू करून महिनाभरात एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जाणार असल्याचा दावा त्यांनी केला. वाळूजला यापूर्वीच पाच कोटींची राष्ट्रीय  पेयजल योजना मिळाली होती.

पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता व खाबुगिरीने योजना वांझोटी ठरली व  गावाला आज भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या गावात सार्वजनिक विहिरी, एमआयडीसी व बोअरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.  लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी पडत असल्यामुळे ग्रामपंचायतीने वर्षभरापूर्वी वाढीव पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव सादर केला होता.  एमआयडीसीकडून दररोज १४ लक्ष घनमीटर पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली होती. 

वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर ग्रामपंचायतीने गतवर्षी जुलै महिन्यात २ लाख रुपये अनामत रक्कम एमआयडीसीकडे जमा केली होती. अनामत रक्कम भरल्यानंतर या कामासाठी नवीन जलवाहिनी टाकणे व जलकुंभ उभारण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण दर्शवून जि.प. प्रशासनाने सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला बजावले होते. 

गावातील गंभीर बनलेल्या पाणी प्रश्नाकडे ग्रामपंचायत गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे. गावात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, अनेकजण पदरमोड करून जारचे पाणी विकत घेऊन तहान भागवीत आहेत. गत तीन दशकांपासून  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गाजत असून, याकडे स्थानिक प्रशासन डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Waterपाणीwater shortageपाणीकपातWaluj MIDCवाळूज एमआयडीसीgovernment schemeसरकारी योजना