शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

ताई, माई, अक्का, काका, मामा गावाकडे कधी येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:11 IST

घाटनांद्रा : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. यापूर्वी कधीही विचारपूस न करणारे आता बाहेरगावी राहणाऱ्या गावातील मतदारांना ...

घाटनांद्रा : सध्या सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत आहे. यापूर्वी कधीही विचारपूस न करणारे आता बाहेरगावी राहणाऱ्या गावातील मतदारांना दररोज फोन करुन ताई, माई, अक्का, काका, भाऊ, मामा, मामी गावाकडे कधी येणार, या बरं का, मी उभा आहे. असे म्हणून विणवण्या करताना दिसत आहेत. अनेकजणांना आता नातेवाईक मित्रमंडळी आठवत असून फोनवरूनच नातेसंबंधांना उजाळा देण्यात येत आहे.

घाटनांद्रा परिसरात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानप्रक्रिया १५ जानेवारीला पार पडणार आहे. या निवडणुकीत एकूण ३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यावर्षी शासनाने जरी निवडणुकीच्या निकालानंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याचे सांगितले असले तरी मीच सरपंच होणार अशा आविर्भावात अनेकजण वावरू लागले आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावपातळीवरील मोठ्या प्रतिष्ठेची मानली जाते. भविष्यात जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची पूर्वतयारी म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जाऊ लागले आहे. गावातील बहुतांश नागरिक हे पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव आदी शहरांच्या ठिकाणी नोकरी किंवा रोजगाराच्या निमित्ताने गेलेले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक मोठी अटीतटीची होते. त्यामुळे प्रत्येक मतदार महत्त्वाचा मानला जातो. शहराकडे गेलेले मतदार मतदानासाठी गावाकडे यावेत तसेच त्यांची मते आपल्याला मिळावीत याकरिता उमेदवार आटापिटा करीत आहेत. कधीही विचारपूस न करणारेही आता फोन करून मतदानाला या असे म्हणत असल्याने मतदारांची चांगलीच गोची होत आहे. मात्र, मतदार मतदानाला येणार की, नाही हे १५ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

चौकट

भाडे व खर्चाची चिंता करू नका

ग्रामपंचायत निवडणुकीत उभे असलेले उमेदवार निवडून येण्यासाठी आटापिटा करताना दिसत आहेत. बाहेरगावी असलेल्या आपल्या वॉर्डातील उमेदवारांना फोन करून ख्यालीखुशाली विचारण्यासह मतदानाला येण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच येण्या-जाण्याच्या खर्चाची चिंता करू नका, असे आश्वासन दिल जात आहे.