शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

औरंगाबादेतील मृत्यूची ही प्रवेशद्वारे कधी बंद करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:37 IST

शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई : महापालिकेला कधी जाग येणार?,अतिक्रमण, गाळ - कचऱ्यामुळे नाल्यांची झाली गटारे; अनेक ठिकाणी धोकादायक भगदाडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही. दुर्दैवाने अनेक जण त्या ठिकाणी पडतात. काही जण वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात. ही मृत्यूची प्रवशेद्वारेच असून पालिका ती केव्हा बंद करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी औरंगाबादकरांना तुडुंब भरणाºया नाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याची चाहूल लागताच, मनपाला नालेसफाईची आठवण येते. नेहमीप्रमाणे थातुरमातुर स्वरूपात नाले सफाई करून पावसाळ्याचे चार महिने कसेबसे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यावर महापालिका नाल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. वर्षभर त्यात अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढत जाते. शहरात दहा मोठे नाले आहेत. या दहा मोठ्या नाल्यांना जोडणारे लहान ५३ नाले आहेत. वर्षानुवर्ष हे नाले साफ झालेले नाहीत. त्यामुळे गाळासह अतिक्रमणे आहेत. सर्वच नाले घाणीने तुडुंब भरले आहेत. निराला बाजार, सारस्वत बँक, बारूदगर नाला, सिटीचौक, बन्सीलालनगर, जालाननगर, रेल्वेस्टेशन, पद्मपुरा आदी भागातील नाल्यांची अशीच अवस्था आहे़जयभवानीनगर, एन-४, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, एन-८, एन-६, गांधीनगर, किराडपुरा, औषधी भवन, बंजारा कॉलनी, जालाननगर, ईटखेडा येथील नाले अतिक्रमणांनी आणि गाळाने गच्च भरले आहेत. शहरात तासभर धो-धो पाऊस पडला की, पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते घरे, दुकाने, तळघर, गोदामांमध्ये शिरते.पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे शहराला नाल्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मागील अनेक वर्षांपासून नाले अतिक्रमण मुक्त होण्याची वाट पाहत आहेत.नाल्यावर२५०० अतिक्रमणेनाल्यावर २५०० अतिक्रमणे असल्याचा अहवाल २०१४-१५ मध्ये तयार करण्यात आला होता. सद्य:स्थितीत अतिक्रमणे वाढली असतील. भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून तो अहवाल दिला होता.त्यानुसार अतिक्रमणे पाडण्याची कारवाई झाली असती तर जयभवानीनगरमध्ये एवढी आपत्ती ओढवली नसती. चार वर्षांपासून नालेपाहणी आणि आश्वसनांपलीकडे काहीही समोर आलेले नाही. शहरातील सर्व नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरजऔरंगाबाद : महापालिका हद्दीत बांधकामांचे भविष्यकालीन नियोजन नसणे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अर्थ हव्यासापोटी नाल्यांच्या बदललेल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे शहरातील नाल्यांत साचलेला गाळ औरंगाबादकरांना या पावसाळ्यात त्रासदायक ठरण्याचे संकेत आहेत़ नैसर्गिक नाल्यांची नाली झाल्यामुळे औरंगाबादकरांना दरवर्षीचा पावसाळा धोकादायक ठरतोच आहे़परिस्थिती ‘जैसे थे’चोंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी येथे येऊन आम्हाला तीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीचालक गाडीसहित गटारीत वाहून गेला होता. स्थानिकांनी त्याला त्वरित वर काढले. जे जयभावनीनगरला घडले ते येथे कधीही घडू शकते, असे पार्वती मकरिये यांनी सांगितले.चुकीची माहिती देऊनप्लॉट विक्रीमागील १० वर्षांपासून लक्ष्मी कॉलनी परिसरात राहत आहेत. चुकीची माहिती देऊन प्लॉट विक्री झाल्याचे मनपाने कार्यवाही केली तेव्हा समजले. कारवाई दोन खोल्या पाडल्या गेल्या. आमचे मोठे नुकसान झाले ते सहन केले; पण आता हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. नाल्यातून पाणी प्रवाह पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घराच्या दरवाजासमोरच घाण पाणी साचत आहे, असे अनिता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण