शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील मृत्यूची ही प्रवेशद्वारे कधी बंद करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:37 IST

शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई : महापालिकेला कधी जाग येणार?,अतिक्रमण, गाळ - कचऱ्यामुळे नाल्यांची झाली गटारे; अनेक ठिकाणी धोकादायक भगदाडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही. दुर्दैवाने अनेक जण त्या ठिकाणी पडतात. काही जण वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात. ही मृत्यूची प्रवशेद्वारेच असून पालिका ती केव्हा बंद करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी औरंगाबादकरांना तुडुंब भरणाºया नाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याची चाहूल लागताच, मनपाला नालेसफाईची आठवण येते. नेहमीप्रमाणे थातुरमातुर स्वरूपात नाले सफाई करून पावसाळ्याचे चार महिने कसेबसे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यावर महापालिका नाल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. वर्षभर त्यात अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढत जाते. शहरात दहा मोठे नाले आहेत. या दहा मोठ्या नाल्यांना जोडणारे लहान ५३ नाले आहेत. वर्षानुवर्ष हे नाले साफ झालेले नाहीत. त्यामुळे गाळासह अतिक्रमणे आहेत. सर्वच नाले घाणीने तुडुंब भरले आहेत. निराला बाजार, सारस्वत बँक, बारूदगर नाला, सिटीचौक, बन्सीलालनगर, जालाननगर, रेल्वेस्टेशन, पद्मपुरा आदी भागातील नाल्यांची अशीच अवस्था आहे़जयभवानीनगर, एन-४, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, एन-८, एन-६, गांधीनगर, किराडपुरा, औषधी भवन, बंजारा कॉलनी, जालाननगर, ईटखेडा येथील नाले अतिक्रमणांनी आणि गाळाने गच्च भरले आहेत. शहरात तासभर धो-धो पाऊस पडला की, पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते घरे, दुकाने, तळघर, गोदामांमध्ये शिरते.पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे शहराला नाल्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मागील अनेक वर्षांपासून नाले अतिक्रमण मुक्त होण्याची वाट पाहत आहेत.नाल्यावर२५०० अतिक्रमणेनाल्यावर २५०० अतिक्रमणे असल्याचा अहवाल २०१४-१५ मध्ये तयार करण्यात आला होता. सद्य:स्थितीत अतिक्रमणे वाढली असतील. भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून तो अहवाल दिला होता.त्यानुसार अतिक्रमणे पाडण्याची कारवाई झाली असती तर जयभवानीनगरमध्ये एवढी आपत्ती ओढवली नसती. चार वर्षांपासून नालेपाहणी आणि आश्वसनांपलीकडे काहीही समोर आलेले नाही. शहरातील सर्व नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरजऔरंगाबाद : महापालिका हद्दीत बांधकामांचे भविष्यकालीन नियोजन नसणे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अर्थ हव्यासापोटी नाल्यांच्या बदललेल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे शहरातील नाल्यांत साचलेला गाळ औरंगाबादकरांना या पावसाळ्यात त्रासदायक ठरण्याचे संकेत आहेत़ नैसर्गिक नाल्यांची नाली झाल्यामुळे औरंगाबादकरांना दरवर्षीचा पावसाळा धोकादायक ठरतोच आहे़परिस्थिती ‘जैसे थे’चोंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी येथे येऊन आम्हाला तीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीचालक गाडीसहित गटारीत वाहून गेला होता. स्थानिकांनी त्याला त्वरित वर काढले. जे जयभावनीनगरला घडले ते येथे कधीही घडू शकते, असे पार्वती मकरिये यांनी सांगितले.चुकीची माहिती देऊनप्लॉट विक्रीमागील १० वर्षांपासून लक्ष्मी कॉलनी परिसरात राहत आहेत. चुकीची माहिती देऊन प्लॉट विक्री झाल्याचे मनपाने कार्यवाही केली तेव्हा समजले. कारवाई दोन खोल्या पाडल्या गेल्या. आमचे मोठे नुकसान झाले ते सहन केले; पण आता हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. नाल्यातून पाणी प्रवाह पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घराच्या दरवाजासमोरच घाण पाणी साचत आहे, असे अनिता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण