शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

औरंगाबादेतील मृत्यूची ही प्रवेशद्वारे कधी बंद करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 00:37 IST

शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही.

ठळक मुद्देबेपर्वाई : महापालिकेला कधी जाग येणार?,अतिक्रमण, गाळ - कचऱ्यामुळे नाल्यांची झाली गटारे; अनेक ठिकाणी धोकादायक भगदाडे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील बहुतांश भागांत नाल्यांना जोडणा-या पुलांच्या लगतचा भाग उघडाच आहे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर तो खड्डा दिसून येत नाही. दुर्दैवाने अनेक जण त्या ठिकाणी पडतात. काही जण वाहून जाण्याच्या दुर्घटना घडतात. ही मृत्यूची प्रवशेद्वारेच असून पालिका ती केव्हा बंद करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी औरंगाबादकरांना तुडुंब भरणाºया नाल्यांचा त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्याची चाहूल लागताच, मनपाला नालेसफाईची आठवण येते. नेहमीप्रमाणे थातुरमातुर स्वरूपात नाले सफाई करून पावसाळ्याचे चार महिने कसेबसे काढण्यात येतात. पावसाळा संपल्यावर महापालिका नाल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. वर्षभर त्यात अतिक्रमण, कचरा, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य वाढत जाते. शहरात दहा मोठे नाले आहेत. या दहा मोठ्या नाल्यांना जोडणारे लहान ५३ नाले आहेत. वर्षानुवर्ष हे नाले साफ झालेले नाहीत. त्यामुळे गाळासह अतिक्रमणे आहेत. सर्वच नाले घाणीने तुडुंब भरले आहेत. निराला बाजार, सारस्वत बँक, बारूदगर नाला, सिटीचौक, बन्सीलालनगर, जालाननगर, रेल्वेस्टेशन, पद्मपुरा आदी भागातील नाल्यांची अशीच अवस्था आहे़जयभवानीनगर, एन-४, पुंडलिकनगर, गजानन कॉलनी, एन-८, एन-६, गांधीनगर, किराडपुरा, औषधी भवन, बंजारा कॉलनी, जालाननगर, ईटखेडा येथील नाले अतिक्रमणांनी आणि गाळाने गच्च भरले आहेत. शहरात तासभर धो-धो पाऊस पडला की, पावसाच्या पाण्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे ते घरे, दुकाने, तळघर, गोदामांमध्ये शिरते.पाणी वाहून नेण्याची क्षमता संपल्यामुळे शहराला नाल्यांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ मागील अनेक वर्षांपासून नाले अतिक्रमण मुक्त होण्याची वाट पाहत आहेत.नाल्यावर२५०० अतिक्रमणेनाल्यावर २५०० अतिक्रमणे असल्याचा अहवाल २०१४-१५ मध्ये तयार करण्यात आला होता. सद्य:स्थितीत अतिक्रमणे वाढली असतील. भूमी अभिलेख विभागाने पाहणी करून तो अहवाल दिला होता.त्यानुसार अतिक्रमणे पाडण्याची कारवाई झाली असती तर जयभवानीनगरमध्ये एवढी आपत्ती ओढवली नसती. चार वर्षांपासून नालेपाहणी आणि आश्वसनांपलीकडे काहीही समोर आलेले नाही. शहरातील सर्व नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरज आहे.नाल्यांवरील अतिक्रमणे काढण्याची गरजऔरंगाबाद : महापालिका हद्दीत बांधकामांचे भविष्यकालीन नियोजन नसणे, नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण, अर्थ हव्यासापोटी नाल्यांच्या बदललेल्या नैसर्गिक प्रवाहांमुळे शहरातील नाल्यांत साचलेला गाळ औरंगाबादकरांना या पावसाळ्यात त्रासदायक ठरण्याचे संकेत आहेत़ नैसर्गिक नाल्यांची नाली झाल्यामुळे औरंगाबादकरांना दरवर्षीचा पावसाळा धोकादायक ठरतोच आहे़परिस्थिती ‘जैसे थे’चोंडेश्वरी हाऊसिंग सोसायटी येथे येऊन आम्हाला तीन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. दोन महिन्यांपूर्वी एक दुचाकीचालक गाडीसहित गटारीत वाहून गेला होता. स्थानिकांनी त्याला त्वरित वर काढले. जे जयभावनीनगरला घडले ते येथे कधीही घडू शकते, असे पार्वती मकरिये यांनी सांगितले.चुकीची माहिती देऊनप्लॉट विक्रीमागील १० वर्षांपासून लक्ष्मी कॉलनी परिसरात राहत आहेत. चुकीची माहिती देऊन प्लॉट विक्री झाल्याचे मनपाने कार्यवाही केली तेव्हा समजले. कारवाई दोन खोल्या पाडल्या गेल्या. आमचे मोठे नुकसान झाले ते सहन केले; पण आता हा नवीन प्रश्न उद्भवला आहे. नाल्यातून पाणी प्रवाह पुढे जाण्यासाठी जागाच नसल्याने घराच्या दरवाजासमोरच घाण पाणी साचत आहे, असे अनिता पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण