शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"जेव्हा अतिरेक्यांनी कानपट्टीवर एके ४७ लावली..."; वाचा बॉर्डरलेस संस्थेच्या अधिक कदम यांचे रोमांचक अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 16:10 IST

कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते.

औरंगाबाद : कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते. त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बळकट समाजनिर्मितीसाठी समाजाच्या भावी आईला सक्षम बनविले पाहिजे, असे आवाहन जम्मू-काश्मिरातील अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केलेल्या नागरिकांच्या २३० मुलींना शिक्षण देणारे अधिक कदम यांनी बुधवारी येथे केले.

विवेकानंद महाविद्यालयात आयोजित विवेकानंद व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प जम्मू-काश्मिरातील बॉर्डरलेस संघटनेचे संस्थापक अधिक कदम यांनी गुंफले. ‘काश्मीरचे नवनिर्माण : नव्या नंदनवनाची शोधयात्रा’ या विषयावर कदम यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला कदम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर प्रा. दिलीप महालिंगे आणि प्राचार्य डॉ. श्याम शिरसाठ यांनी त्यांची मुलाखत घेतली. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव श्रीमंत शिसोदे होते.  सूत्रसंचालन प्रा. अनिल लहाने यांनी केले.

यावेळी कदम यांनी त्यांचा जीवनपट उलगडून दाखवला. २२ वर्षांपूर्वी काश्मिरात एक घटना घडली. तेव्हा मित्रांसह २४०० रुपये घेऊन जम्मूत पोहोचलो. अनेक मित्र होते. मात्र आम्हाला जम्मू ओलांडून काश्मिरात जाता आले नाही. माझ्यासह तीन मित्र होते. बाकीचे गावी परतले. तेव्हाच ठरविले की, अतिरेकी कोणाच्या तरी घराला उडवतात. तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांसाठी, मुलींसाठी काम केले पाहिजे. सोबत घेऊन गेलेल्या २४०० रुपयांपैकी ७०० रुपये खर्च झाले. अनेक घरांमध्ये राहण्याचा योग आला. मात्र सुरुवातीला अनेकांना वाटे हा  खबऱ्या असावा. यातून हाकलून दिले तरीही जिद्द सोडली नाही. 

काही चांगले लोकही भेटले. त्यांनी घरात आसरा दिला. तेव्हापासून आजपर्यंत एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. बॉर्डरलेस संस्थेची उभारणी केली. अनेक मदतीचे हात पुढे आले. यातून हे कार्य घडत गेले. आतापर्यंत अतिरेक्यांच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील ११३ मुलींना शिक्षण देऊन लग्न लावून दिले. सध्या २३० मुलींना शिक्षण देणे सुरू आहे. अतिरेक्यांनी आई-वडिलांना मारल्यानंतर मागे उरलेल्या मुलींची काहीही चूक नसते. त्यांची जिम्मेदारी घेतली.  सांभाळ केला. सकारात्मक वागून त्यांच्यात दिसणारी भविष्यातील आई उभी करायची आहे. ते कार्य करतो, असेही अधिक कदम यांनी सांगितले. 

प्रा. महालिंगे यांनी कदम यांना अतिरेक्यांनी १९ वेळा पकडले तेव्हा काय वाटले? असा प्रश्न विचारला. तेव्हा कदम म्हणाले,  मी हिमालयात साधना करायला गेलो आहे. त्यात कितीही अडथळे आले तरी ती साधना संपणार नाही. एक वेळा एके ४७ गणची नळी कानपट्टीवर लावली होती. तेव्हा डोळे मिटून घेतले. मात्र त्या अतिरेक्यात काय सकारात्मक बदल झाला माहीत नाही. पण त्यांनी मारले नाही. असे अनेक प्रसंग घडले. मुळात तुम्ही निखळ असाल ना तर संकट टळते, याची अनुभूती वारंवार आली. यातूनच घडत गेलो, असेही कदम यांनी सांगितले. 

सीमारेषा माणसाच्या अहंकाराचे प्रतीकसीमारेषांनी देशातील संबंध बिघडतात का, या प्रश्नावर ते म्हणाले, माणसाच्या विकृतीचे, अहंकाराच्या प्रतीक आहेत. १९४७ नंतर अनेक कुटुंब सीमेपलीकडे जाऊ शकले नाहीत. मात्र अनेकांनी लग्नाचा आनंद साजरा केला. यातून देशाच्या सीमारेषा या लोकांच्या मनामध्ये असलेल्या सीमा घालवू शकत नाही हे स्पष्ट होते. मुंबईसारख्या शहरावर हल्ला होतो. हे सीमांमध्ये विश्वास याचेच लक्षण असल्याचेही अधिक कदम यांनी सांगितले.

टॅग्स :BorderसीमारेषाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी