जालना : मनरेगा मार्फत करण्यात आलेल्या विहीरीच्या कामाचा ६५ हजाराचा धनादेश काढण्यासाठी ३ हजाराची लाच स्वीकारताना माजलगाव ता. बदनापूर येथील ग्राम रोजगार सेवक भरत अंकुश वाघ यास बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले. माजरगाव येथील तक्रारदार शेतकऱ्यास मग्रारोहयो अंतर्गत विहीर मंजूर करण्यात आली होती. विहिरीच्या कामाचा शेवटा धनादेश ६५ हजार रूपये काढून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक वाघ यांनी शेतकऱ्यास ५ हजारांची लाच मागीतली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने त्या शेतकऱ्याने या संदर्भात अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार २९ जुलै रोजी अॅन््टी करप्शन ब्युरोच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यातवेळी ग्रामरोजगार सेवक वाघ यांनी ५ हजाराची लाच मागून तडजोडी अंती ३ हजार रूपये घेण्याचे स्विकारण्यास कबुल दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बदनापूर येथील चर्च समोरील एका हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला. लाच स्किारताच वाघ यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कार्यवाही अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस सवामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रविण मोरे, पोलिस निरीक्षक व्ही. बी. चिंचोले, व्ही.एल.चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, किशोर पाटील, संतोष धायडे, नंदु शेडीवाले, प्रदीप दौडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, प्रदीप उबाळे, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संजय राजपूत यांनी पारपाडली. (प्रतिनिधी)
लाच घेताना
By admin | Updated: July 30, 2015 00:15 IST