शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

पावसाळा लांबला तरच रेल्वेने पाणी

By admin | Updated: March 30, 2016 00:48 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांची गरज लक्षात घेऊन लातूर शहरासाठी जून अखेरपर्यंत पाणी पुरू शकते़ पाऊस लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय असून त्यानुसार राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ हजार पेक्षा अधिक अधिग्रहण करण्यात आले आहेत़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात असलेल्या पाणी साठ्यावर लातूर जिल्ह्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ या साठ्यांत उपलब्ध पाणी बऱ्यापैकी आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे़ पाणीटंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ सद्या भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केले आहे़ तेथील लोकांची गरज आणि लातूर शहराची गरज लक्षात घेऊन या पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे़ तांत्रिक बाबीची तपासणी व नियोजनामुळे जून अखेरपर्यंत पाणी पुरेल़ पावसाळा लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय आहे़ त्यानुसार राज्यशासनाकडे यापुर्वीच प्रस्ताव गेला आहे़ शासनाच्या विचाराधीन हा प्रस्ताव असून, शासनस्तरावर त्याची पडताळणी होत असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)