शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

पावसाळा लांबला तरच रेल्वेने पाणी

By admin | Updated: March 30, 2016 00:48 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांची गरज लक्षात घेऊन लातूर शहरासाठी जून अखेरपर्यंत पाणी पुरू शकते़ पाऊस लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय असून त्यानुसार राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ हजार पेक्षा अधिक अधिग्रहण करण्यात आले आहेत़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात असलेल्या पाणी साठ्यावर लातूर जिल्ह्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ या साठ्यांत उपलब्ध पाणी बऱ्यापैकी आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे़ पाणीटंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ सद्या भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केले आहे़ तेथील लोकांची गरज आणि लातूर शहराची गरज लक्षात घेऊन या पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे़ तांत्रिक बाबीची तपासणी व नियोजनामुळे जून अखेरपर्यंत पाणी पुरेल़ पावसाळा लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय आहे़ त्यानुसार राज्यशासनाकडे यापुर्वीच प्रस्ताव गेला आहे़ शासनाच्या विचाराधीन हा प्रस्ताव असून, शासनस्तरावर त्याची पडताळणी होत असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)