शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लांबला तरच रेल्वेने पाणी

By admin | Updated: March 30, 2016 00:48 IST

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्

लातूर : लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई असून, या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी स्थानिक स्त्रोत उपलब्ध आहेत़ भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधून सध्या पाणी घेतले जात आहे़ प्रकल्प क्षेत्रातील स्थानिकांची गरज लक्षात घेऊन लातूर शहरासाठी जून अखेरपर्यंत पाणी पुरू शकते़ पाऊस लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय असून त्यानुसार राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई आहे़ या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी १ हजार पेक्षा अधिक अधिग्रहण करण्यात आले आहेत़ शिवाय, २६५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ जिल्ह्यात असलेल्या पाणी साठ्यावर लातूर जिल्ह्याची तहान भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ सद्य स्थितीत भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमध्ये पाणी उपलब्ध आहे़ या साठ्यांत उपलब्ध पाणी बऱ्यापैकी आहे़ तेथील स्थानिक लोकांची गरज, प्रकल्पातील गाळ, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट हे सर्व मुद्दे लक्षात घेतल्यासही जून अखेरपर्यंत लातूर शहराला पाणी पुरु शकते़ त्यानुसार पाणी वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे़ पाणीटंचाईचा तीव्र काळ फेबु्रवारी, मार्च होता़ उपाययोजना केल्यानंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे़ सद्या भंडारवाडी, निम्न तेरणा, डोंगरगाव व धनेगाव बॅरेजेसमधील पाणी पिण्यासाठी आरक्षीत केले आहे़ तेथील लोकांची गरज आणि लातूर शहराची गरज लक्षात घेऊन या पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले आहे़ तांत्रिक बाबीची तपासणी व नियोजनामुळे जून अखेरपर्यंत पाणी पुरेल़ पावसाळा लांबला तर उजनी प्रकल्पातील पाणी रेल्वेने आणण्याचा पर्याय आहे़ त्यानुसार राज्यशासनाकडे यापुर्वीच प्रस्ताव गेला आहे़ शासनाच्या विचाराधीन हा प्रस्ताव असून, शासनस्तरावर त्याची पडताळणी होत असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)