शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मी कविता लिहिते, तेव्हा कृतीच करीत असते, माणूसपणाच्या जवळ जाण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 14:13 IST

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केले मनोगत

- ऋचिका पालोदकर 

औरंगाबाद : साहित्य अकादमीचे पुरस्कार बुधवारी दुपारी जाहीर झाले आणि कवयित्री अनुराधा पाटील यांच्या रूपाने साहित्य अकादमीच्या पुरस्कारावर पुन्हा एकदा मराठवाडी मोहोर उमटली. शांत भावनेने आणि स्थिर चित्ताने आपण पुरस्काराचा आत्मिक आनंद व्यक्त करीत आहोत, असे सांगत अनुराधातार्इंनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कवयित्री म्हणून माझ्यातल्या बदलत्या जाणिवा मांडणारा ‘कदाचित अजूनही’ हा काव्यसंग्रह असून, आपण यातून सामाजिक व्यथा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. 

‘कदाचित अजूनही’ कविता संग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर  पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.  ‘हजारो वर्षांपासून आपण मागतो आहोत, सुईच्या अग्रावर मावेल एवढी तरी भूमी पाय टेकवण्यापुरती, पण हरणाऱ्यांच्या बाबतीत तर इतिहासही निर्दय असतो कायम, म्हणून मी कविता लिहिते, तेव्हा कृतीच करीत असते, माणूसपणाच्या अधिकाधिक जवळ जाण्याची...’ ही कविता वाचून त्यांनी चर्चेला सुरुवात केली.

पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सगळ्यात पहिली भावना काय होती?- सगळ्यात पहिल्यांदा खरेतर नवल वाटले; पण राष्ट्रीय स्वरूपाचा पुरस्कार मिळाल्याचा आत्मिक आनंद आहे. खरे तर तरुण वयात तुमच्या भावना अधिक उत्कट असतात. तुम्हाला खेचून नेणाऱ्या असतात; पण आता ज्या वयात मला पुरस्कार मिळाला आहे, त्याचा मी अत्यंत शांतपणे आणि खूप संथपणे स्वीकार करते. पुरस्कार मिळाल्यावर तुमच्या लिखाणावर परिणाम होतो किंवा लेखनाचा दर्जा बदलतो, असे अजिबात नाही. फक्त तुम्ही जे काही क ाम केले आहे, त्याचा आत्मिक आनंद देणारी ती एक पोचपावती असते. हा पुरस्कार माझ्या एकटीचा नाही. ज्यांचा राहून गेला, अशा सगळ्यांचाच तो गौरव आहे, असे मी मानते. 

‘कदाचित अजूनही’ या कविता संग्रहाबाबत काय सांगाल?- एकंदरीतच एक कवयित्री म्हणून माझ्यात जे बदल होत गेले, त्या सर्व बदलत्या जाणिवांना मांडणारा हा काव्यसंग्रह आहे. या संग्रहात स्त्रियांसंदर्भातील विविध प्रश्न आणि मानवी जगण्याबाबतचे प्रश्न मांडले आहेत. खरे तर स्त्रीवाद हा आता बदनामीचा शब्द झाला आहे. काही जणांना तो नकारात्मक वाटतो. मी स्त्रीवादी नाही; पण तरीही स्त्रियांच्या बाजूने काही कविता मांडल्या आहेत. ज्यांना काही चेहरा नाही, अशांवरही या काव्यसंग्रहातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. 

‘कदाचित अजूनही’बाबत एखादा मनावर कोरलेला अनुभव?- हे अनुभवसंचित माझे एकटीचे नसून माझ्या सभोवती असणाऱ्या समूहाचे आहे. बालमजुरांच्या अनेक समस्या, त्यांचे प्रश्न मी अगदी जवळून पाहिले आहेत. एक कवयित्री म्हणून माझे संवेदनशील मन त्याबद्दल हळहळते; पण तरीही जेव्हा या मुलांवर अवलंबून असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचा विचार मनात डोकावतो, तेव्हा त्यांची काम करण्यामागची हतबलता लक्षात येते. हळहळण्याव्यतिरिक्त आणि तुटपुंंजी मदत करण्याव्यतिरिक्त मी त्यांच्यासाठी काहीही करू शकत नाही, त्यांच्या समस्या सोडवू शकत नाही, याची खंत मला जाणवते. यातूनच ‘कदाचित अजूनही’मधील काही कविता स्फुरलेल्या आहेत.

जाहीर झालेल्या पुरस्कारांपैकी कविता संग्रहांचे प्रमाण सर्वाधिक आहे, याबाबत काय वाटते?- कवितासंग्रहांना सर्वाधिक पुरस्कार जाहीर झाले, ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. कविता हा सार्वत्रिक आणि सर्वात जास्त लिहिला जाणारा साहित्य प्रकार आहे. मानवाची जेथून सुरुवात झाली, तेथूनच कवितेची निर्मिती झाली, असे म्हणतात.  

माझ्यापेक्षाही जास्त आनंद कौतिकरावांनामाझी कविता पुढे जाण्याचे सगळे श्रेय माझ्या पतीलाच आहे. माझी कविता उभी राहिली तीच मुळात कौतिकराव ठाले पाटील यांच्यामुळे. भारतीय स्त्री म्हणून नवऱ्याला यशाचे श्रेय देत आहे, असे मुळीच नाही. नवी जोडपी ज्याप्रमाणे एकमेकांना स्पेस देतात, त्यांच्यात अभिमानाचे मुद्दे गळून पडतात, तसेच नाते आम्ही कित्येक वर्षांपासून जपले आहे. माझ्या कवितेवर काम करणे, पत्रव्यवहार बघणे ही सर्व कामे तेच करतात. या पुरस्काराचा माझ्यापेक्षाही जास्त आनंद त्यांना झाला असून, त्यांच्या बायकोचा त्यांना जो अभिमान वाटतो, त्याला तोड नाही. 

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादmarathiमराठी