शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

‘महिलाओंके लिए अच्छे दिन कब?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या ...

ठळक मुद्देफौजिया खान : महिलादिनी राष्ट्रवादी महिलांचे चिंतन; मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारच्या ध्येयधोरणांवर हल्लाबोल केला.राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज सकाळी राष्टÑवादी भवन, हडको एन-११ येथे बैठक झाली. या बैठकीतील निर्णय त्यांनी दुपारी एका पत्रपरिषदेत जाहीर केले.यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस टीपी पितांबरन मास्टरजी, राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस सीमा मलिक, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेहराज पटेल आदींची उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, गुजरात, झारखंड या राज्यांतून व देशभरातून महिला प्रतिनिधींची या बैठकीस उपस्थिती होती. लवकरच घेतलेल्या निर्णयावर कृती कार्यक्रम राज्या-राज्यांतून लागू करण्यात येईल.१० टक्के तरतूद करा.....आम्ही महिला दिन साजरा करीत नव्हतो तर महिलांच्या संदर्भातील प्रश्नांची चिंता व्यक्त करीत होतो. सरकारने स्त्री-पुरुष जन्मदरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी दूर करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्केतरतूद करावी, अशी आमची आग्रहाची मागणी असल्याचे फौजिया खान यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारने जी तरतूद केली, ती तरतूद नरेंद्र मोदी सरकारने कमालीची घटविली आहे. केवळ शंभर कोटींची तरतूद अत्यंत तुटपुंजी आहे. दुसरीकडे वंशाला दिवा मुलगाच हवा, या भावनेतून स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढतच आहे, समाज मुलीच्या जन्माचे स्वागत करू मागत नाही, ही खेदाची गोष्ट होय. शेवटी ‘ बेटी बचेगी तो दुनिया बचेगी’. हे सरकार बोलते एक आणि प्रत्यक्षात कृती वेगळीच करते.चंद्रकलाबाई सोळुंके यांचा गौरवजागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी आयोजित ‘राष्ट्रीय महिला काँग्रेस स्त्री जागर सोहळ्यात चंद्रकलाबाई सोळुंके यांना राष्ट्रवादी महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एकही दिवस शाळेत न जाता स्वत: अक्षर ओळख करून घेऊन त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी महिलांना प्रेरणा देणारे ‘नारी तू गंजू नकोस’ हे ९६ पानी पुस्तक लिहिले. राष्ट्रवादीचे नेते टी.पी. पितांबर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत आणि माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्षा मेहराज पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मिलन नायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.