शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘महिलाओंके लिए अच्छे दिन कब?’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या ...

ठळक मुद्देफौजिया खान : महिलादिनी राष्ट्रवादी महिलांचे चिंतन; मोदी सरकारच्या ध्येयधोरणावर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महिलाओंके लिए अच्छे दिन कब आयेंगे, असा सवाल करीत अ. भा. राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा फौजिया खान यांनी नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारच्या ध्येयधोरणांवर हल्लाबोल केला.राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज सकाळी राष्टÑवादी भवन, हडको एन-११ येथे बैठक झाली. या बैठकीतील निर्णय त्यांनी दुपारी एका पत्रपरिषदेत जाहीर केले.यावेळी राष्टÑवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस टीपी पितांबरन मास्टरजी, राष्टÑवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस सीमा मलिक, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मेहराज पटेल आदींची उपस्थिती होती. त्यांनी सांगितले की, केरळ, तामिळनाडू, गुजरात, झारखंड या राज्यांतून व देशभरातून महिला प्रतिनिधींची या बैठकीस उपस्थिती होती. लवकरच घेतलेल्या निर्णयावर कृती कार्यक्रम राज्या-राज्यांतून लागू करण्यात येईल.१० टक्के तरतूद करा.....आम्ही महिला दिन साजरा करीत नव्हतो तर महिलांच्या संदर्भातील प्रश्नांची चिंता व्यक्त करीत होतो. सरकारने स्त्री-पुरुष जन्मदरातील दिवसेंदिवस वाढत चाललेली दरी दूर करण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक क्षेत्रात महिलांसाठी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्केतरतूद करावी, अशी आमची आग्रहाची मागणी असल्याचे फौजिया खान यांनी नमूद केले. त्यांनी सांगितले की, यूपीए सरकारने जी तरतूद केली, ती तरतूद नरेंद्र मोदी सरकारने कमालीची घटविली आहे. केवळ शंभर कोटींची तरतूद अत्यंत तुटपुंजी आहे. दुसरीकडे वंशाला दिवा मुलगाच हवा, या भावनेतून स्त्रीभ्रूणहत्यांचे प्रमाण वाढतच आहे, समाज मुलीच्या जन्माचे स्वागत करू मागत नाही, ही खेदाची गोष्ट होय. शेवटी ‘ बेटी बचेगी तो दुनिया बचेगी’. हे सरकार बोलते एक आणि प्रत्यक्षात कृती वेगळीच करते.चंद्रकलाबाई सोळुंके यांचा गौरवजागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे गुरुवारी आयोजित ‘राष्ट्रीय महिला काँग्रेस स्त्री जागर सोहळ्यात चंद्रकलाबाई सोळुंके यांना राष्ट्रवादी महिला गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एकही दिवस शाळेत न जाता स्वत: अक्षर ओळख करून घेऊन त्यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी महिलांना प्रेरणा देणारे ‘नारी तू गंजू नकोस’ हे ९६ पानी पुस्तक लिहिले. राष्ट्रवादीचे नेते टी.पी. पितांबर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत आणि माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीस सोनाली देशमुख, शहराध्यक्षा मेहराज पटेल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या. मिलन नायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.