शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

थेट कारवाईने काय साध्य होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:19 IST

मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य होणार आहे, असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील दांडीबहाद्दर कर्मचारी अथवा ग्रामीण भागात मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य होणार आहे, असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित केला.पवनीत कौर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. आज सोमवारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला तेव्हा चर्चेतून समोर आलेल्या बाबी अशा- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड व पवनीत कौर यांच्या कार्यपद्धती भिन्न आहेत. ‘चुकीला माफी नाही’, अशी भूमिका तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची होती, तर पवनीत कौर म्हणतात, चुकणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर थेट कारवाई करून काय साध्य होणार आहे. त्यांना चूक सुधारण्यासाठी पहिल्यांदा संधी दिली पाहिजे.प्राथमिक आरोग्य कें द्रांचे बरेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत, अशा तक्रारी आल्या आहेत. त्यांना नोटिसीद्वारे वर्तन सुधारण्याची संधी देऊ. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई करू.यावेळी जिल्ह्यातील ‘टँकरलॉबी’बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जिल्ह्यात जवळपास ५०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्वच टँकरला ‘जीपीएस’ यंत्रणार बसविण्यात आलेली आहे. टँकरच्या किती खेपा झाल्या, निश्चित केलेल्या क्षमतेएवढेच टँकर चालतात की कमी क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, या बाबींवर गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांमार्फत नियंत्रण केले जाते. असे असले तरी जि. प. मुख्यालयातून यासंदर्भात ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ केले जाते का, यावर त्या म्हणाल्या, सध्या तरी नाही; पण अधिका-यांवर तर विश्वास दाखवलाच पाहिजे. तरीही त्यासंबंधी गांभीर्याने विचार केला जाईल.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी