शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
3
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
4
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
5
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
6
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
7
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
8
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
10
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
11
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
12
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
13
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
15
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
16
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
17
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
18
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
19
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
20
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

थेट कारवाईने काय साध्य होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:19 IST

मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य होणार आहे, असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील दांडीबहाद्दर कर्मचारी अथवा ग्रामीण भागात मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या अधिकारी- कर्मचा-यांची माहिती जाणून घेत आहे. अशा कर्मचा-यांना त्यांच्या चुका सुधारण्यासाठी अगोदर संधी दिली जाईल. त्यानंतरही त्यांनी सुधारणा केली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल. थेट कारवाई केल्याने काय साध्य होणार आहे, असा सवाल मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित केला.पवनीत कौर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे घेऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी झाला आहे. आज सोमवारी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला तेव्हा चर्चेतून समोर आलेल्या बाबी अशा- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड व पवनीत कौर यांच्या कार्यपद्धती भिन्न आहेत. ‘चुकीला माफी नाही’, अशी भूमिका तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची होती, तर पवनीत कौर म्हणतात, चुकणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर थेट कारवाई करून काय साध्य होणार आहे. त्यांना चूक सुधारण्यासाठी पहिल्यांदा संधी दिली पाहिजे.प्राथमिक आरोग्य कें द्रांचे बरेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत, अशा तक्रारी आल्या आहेत. त्यांना नोटिसीद्वारे वर्तन सुधारण्याची संधी देऊ. त्यानंतरही त्यांच्यात सुधारणा झाली नाही, तर मग त्यांच्यावर कारवाई करू.यावेळी जिल्ह्यातील ‘टँकरलॉबी’बाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, जिल्ह्यात जवळपास ५०० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्वच टँकरला ‘जीपीएस’ यंत्रणार बसविण्यात आलेली आहे. टँकरच्या किती खेपा झाल्या, निश्चित केलेल्या क्षमतेएवढेच टँकर चालतात की कमी क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, या बाबींवर गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांमार्फत नियंत्रण केले जाते. असे असले तरी जि. प. मुख्यालयातून यासंदर्भात ‘क्रॉस व्हेरिफिकेशन’ केले जाते का, यावर त्या म्हणाल्या, सध्या तरी नाही; पण अधिका-यांवर तर विश्वास दाखवलाच पाहिजे. तरीही त्यासंबंधी गांभीर्याने विचार केला जाईल.

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEmployeeकर्मचारी