शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळच का हो?

By admin | Updated: January 19, 2015 00:56 IST

आशपाक पठाण , लातूर एकमेकांची टिंगल टवाळी, कोणाची कूरघोडी तर हळूच कोणाची तरी विषय सोडून बडबड. अतिक्रमण.. अतिक्रमण.. अन् अतिक्रमण... एवढाच विषय कानी पडला.

आशपाक पठाण , लातूरएकमेकांची टिंगल टवाळी, कोणाची कूरघोडी तर हळूच कोणाची तरी विषय सोडून बडबड. अतिक्रमण.. अतिक्रमण.. अन् अतिक्रमण... एवढाच विषय कानी पडला. लहान मुलांप्रमाणे एकमेकांची चेष्टा करीत वाट्टेल ते बोलले जात होते. समोर बसलेले महापौर आणि आयुक्त यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत होत्या. मध्येच कोणी तरी वेगळेपणा दाखविण्यासाठी इकडून तिकडे करीत होते. हा सर्व प्रसंग पाहून एसओएस बालग्रामचे विद्यार्थी आचंबित झाले. मनपाची सर्वसाधारण सभा म्हणजे गोंधळच असतो का, असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला.लातूर शहरातील एसओएस बालग्राम ही संघटना अनाथ मुला-मुलींचे संगोपन करते. या संस्थेने शेकडो मुलांचे पुनर्वसन केले आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामकाजाची माहिती व्हावी म्हणून प्रभाग समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी या संस्थेतील मुलांना निमंत्रित केले होते. मनपाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात असलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये शहराच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव घेतला. सकाळी ११ वाजता एसओएस बालग्रामच्या संचालिका वैष्णवी जोगळेकर या २८ मुलांना घेऊन सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसल्या. मुलांना सकाळपासूनच ओढ लागली होती ती सर्वसाधारण सभेच्या कामकाज पाहणीची. घाई घाईत मुलांनी जागा पकडली. सभागृहात कामकाज सुरू होताच अतिक्रमण हटविण्याच्या मुद्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. कोण काय बोलतो, हेच कळत नव्हते. महापौरांनी परवानगी दिलेल्या सदस्याव्यतिरिक्त इतर सदस्यही जोर जोरात बोलत होते. ५० टक्के महिलांना आरक्षण असल्याने ३५ महिला नगरसेविका हा सर्व गोंधळ गप्प बसून ऐकत होत्या. सभागृहात फक्त पुरुषांनाच प्रश्न विचारण्याचा व गोंधळ घालण्याचा अधिकार आहे का, अशी कुजबूज विद्यार्थ्यांमध्ये सुरू होती. एकाच विषयावर जोर जोरात सुरू झालेला गोंधळ पाहून महापौर अख्तर शेख यांनी सदस्यांना विनवणी केली. मनपाच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी व आपला आदर्श घेण्यासाठी विद्यार्थी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले आहेत, अशी माहिती देऊनही सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. तब्बल दोन तास एकच विषय अन् गोंधळाला कंटाळून अखेर हे विद्यार्थी सभागृह सोडून निघून गेले. सर्वसाधारण सभेचे कामकाज म्हणजे गोंधळच असतो. इथे शिस्त आणि मर्यादा सांभाळल्याच जात नाहीत. सभागृहात विषय सोडून अवांतर विषयावरच कसा वेळ घालवितात, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला़ महापौर व आयुक्तांना खरंच अतिक्रमणाची व्याख्या माहीत नसेल का? वरिष्ठ अधिकारी असे जाणीवपूर्वक तर करीत नसावेत, असा प्रश्न त्या विद्यार्थ्यांना पडला. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाल्यावर अशीच वागणूक मिळेल का, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना बोचत होते़मते मागण्यासाठी दारात येणारे लोकप्रतिनिधी सभागृहात कसे प्रश्न मांडतात, हे पाहण्यासाठी एसओएस बालग्रामचे विद्यार्थी मनपात आले होते. एकाच विषयावर प्रारंभीपासून तेही ठराविक सदस्यांचा गोंधळ पाहून प्रथमच कामकाज पाहणीसाठी आलेले विद्यार्थी हसत होते. लहान मुलांप्रमाणे सुरू असलेला हा खेळ विद्यार्थ्यांना भावला नाही. विद्यार्थ्यांना बालग्रामच्या संचालिका वैष्णवी जोगळेकर यांनी सभागृहात येण्यापूर्वीच सकारात्मक दृष्टीने अनुभव घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी हा गोंधळ पाहून आपणही धीट बनले पाहिजे. स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. जेणे करून विषय मांडता यावेत. किरकोळ विषय असला, तरी त्याकडे गांभीर्याने पहायला हवे, असा संदेश घेऊन विद्यार्थी निघून गेले.