शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:41 IST

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे नागरिक नियम पाळायला तयार नाहीत पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या आज झपाट्याने वाढलेली असते, तर दुसऱ्या दिवशी संख्या अत्यंत कमी झालेली असते. रुग्णसंख्येतील या चढ-उतारामुळे आरोग्य यंत्रणा त्रस्त झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात तरी कशी आणावी, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मागील पंधरा दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्यामुळे चिंता अधिक वाढू लागली आहे. 

महापालिका हद्दीत सध्या ३ हजार ९४३ म्हणजे जवळपास चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात २३२ रुग्ण दाखल झाले, तर १४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंतेत भर पडत आहे. मागील पंधरा दिवसांच्या रुग्णसंख्येवर नजर फिरवली असता कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे.

जिल्ह्यात खाटा संनियंत्रणासाठी कक्ष01. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे संनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.02. यामध्ये उपायुक्त पशुसंवर्धन प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने, सहायक विक्रीकर आयुक्त गजानन जोशी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी हर्षा देशमुख, सहायक आयुक्त विक्रीकर योगेश नेतनकर, गोपालकृष्ण यादव, मकरंद कंकाल, धनंजय कोळी, संदीप शेजूळ, नितीन भोसले यांचा समावेश आहे. 03. कोरोना प्रतिबंध, उपचार व रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनाबाबत २४ तास मनपा मुख्यालयातील हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सदर कक्ष नागरिक, रुग्णांचे नातवाईक, कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासंबंधी वैद्यकीय खाटांची उपलब्धता व वाटप इतर पूरक सुविधांसंबंधी मदतीकरिता स्थापन करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे हे संनियंत्रण अधिकारी म्हणून, तर वैद्यकीय अधिकारी प्रेरणा संकलेचा, डॉ. नीता पाडळकर या समन्वय अधिकारी असतील. 

नागरिकांनी नियम पाळावेतशहरात कोरोना नाही अशा पद्धतीने अनेक नागरिक वावरत आहेत. शहरासाठी ही अत्यंत धोक्याची बाब असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर केलाच पाहिजे. या दोन गोष्टी १०० टक्के पाळल्या गेल्या, तर संसर्ग काही प्रमाणात कमी होईल. पूर्वीच्या पद्धतीने रुग्ण शोधणे आणि तपासण्या करणे हे काम महापालिकेकडून नियमितपणे सुरू आहे. रुग्णसंख्येत कमी-जास्त वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. - नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

रुग्णसंख्येतील                 चढता-उतरता आलेखतारीख     रुग्णसंख्या२७ आॅगस्ट     २६०२८ आॅगस्ट     २७७२९ आॅगस्ट     २४२३० आॅगस्ट    १८४०१ सप्टेंबर     १७८०२ सप्टेंबर     २६६०३ सप्टेंबर     २५१०४ सप्टेंबर     ३३४०५ सप्टेंबर    २२८०७ सप्टेंबर    ३१३०८ सप्टेंबर    २६११० सप्टेंबर    २७०११ सप्टेंबर     २९३१२ सप्टेंबर    २३२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद