शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
2
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
3
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
4
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
5
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
6
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
7
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
8
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
9
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
10
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
11
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
12
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
13
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
14
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
15
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
16
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
17
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
18
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
19
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
20
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 12:41 IST

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्दे नागरिक नियम पाळायला तयार नाहीत पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या आज झपाट्याने वाढलेली असते, तर दुसऱ्या दिवशी संख्या अत्यंत कमी झालेली असते. रुग्णसंख्येतील या चढ-उतारामुळे आरोग्य यंत्रणा त्रस्त झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात तरी कशी आणावी, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मागील पंधरा दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्यामुळे चिंता अधिक वाढू लागली आहे. 

महापालिका हद्दीत सध्या ३ हजार ९४३ म्हणजे जवळपास चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात २३२ रुग्ण दाखल झाले, तर १४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंतेत भर पडत आहे. मागील पंधरा दिवसांच्या रुग्णसंख्येवर नजर फिरवली असता कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे.

जिल्ह्यात खाटा संनियंत्रणासाठी कक्ष01. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे संनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.02. यामध्ये उपायुक्त पशुसंवर्धन प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने, सहायक विक्रीकर आयुक्त गजानन जोशी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी हर्षा देशमुख, सहायक आयुक्त विक्रीकर योगेश नेतनकर, गोपालकृष्ण यादव, मकरंद कंकाल, धनंजय कोळी, संदीप शेजूळ, नितीन भोसले यांचा समावेश आहे. 03. कोरोना प्रतिबंध, उपचार व रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनाबाबत २४ तास मनपा मुख्यालयातील हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सदर कक्ष नागरिक, रुग्णांचे नातवाईक, कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासंबंधी वैद्यकीय खाटांची उपलब्धता व वाटप इतर पूरक सुविधांसंबंधी मदतीकरिता स्थापन करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे हे संनियंत्रण अधिकारी म्हणून, तर वैद्यकीय अधिकारी प्रेरणा संकलेचा, डॉ. नीता पाडळकर या समन्वय अधिकारी असतील. 

नागरिकांनी नियम पाळावेतशहरात कोरोना नाही अशा पद्धतीने अनेक नागरिक वावरत आहेत. शहरासाठी ही अत्यंत धोक्याची बाब असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर केलाच पाहिजे. या दोन गोष्टी १०० टक्के पाळल्या गेल्या, तर संसर्ग काही प्रमाणात कमी होईल. पूर्वीच्या पद्धतीने रुग्ण शोधणे आणि तपासण्या करणे हे काम महापालिकेकडून नियमितपणे सुरू आहे. रुग्णसंख्येत कमी-जास्त वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. - नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.

रुग्णसंख्येतील                 चढता-उतरता आलेखतारीख     रुग्णसंख्या२७ आॅगस्ट     २६०२८ आॅगस्ट     २७७२९ आॅगस्ट     २४२३० आॅगस्ट    १८४०१ सप्टेंबर     १७८०२ सप्टेंबर     २६६०३ सप्टेंबर     २५१०४ सप्टेंबर     ३३४०५ सप्टेंबर    २२८०७ सप्टेंबर    ३१३०८ सप्टेंबर    २६११० सप्टेंबर    २७०११ सप्टेंबर     २९३१२ सप्टेंबर    २३२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद