शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

विहिरी, तलाव कोरडेठाक, जोरदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़

केदारखेडा : केदारखेडा व परिसरात अद्याप एकही जोरदार पाऊस झालेला नसल्याने परिसरातील तलाव, विहिरींची पाणी पातळी वाढलेली नाही़ पावसाळा सुरु होऊन महिना उलटला असला तरी परिसरातील तलाव, विहिरी अद्यापही कोरड्याठाक आहेत़ गतवर्र्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडला. या पावसामुळे पूर्णा नदीला एक पूरही गेला होता. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता़ कारण गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या जवळपास सर्व सार्वजनिक विहिरी नदीपात्रात आहेत. या विहिरींची पाणी पातळी चांगल्या प्रमाणात वाढलेली होती़ यावर्षीच्या नुकत्याच झालेल्या पाण्याने सध्या तरी जनावरांची व ग्रामस्थांची पाणी समस्या सुटली आहे़ परंतु पावसाळ्यानंतर बारामाही पाण्यासाठी तलाव, शेतातील विहिरींची पाणी पातळी वाढण्याची गरज आहे़ त्यासाठी जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यावर्षी जून महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वात जास्त पिण्याच्या पाण्याचे हाल ग्रामस्थांचे झाले़. यावर्षी पाऊस न झाल्याने पिण्याची तीव्र टंचाई सुरु झाली आहे. जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. जंगलातील वन्य प्राण्यांचेही पाण्याअभावी हाल होत आहेत. चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तीही फोल ठरली आहे. पावसाच्या आशेवर करण्यात आलेली पेरणी पूर्णपणे वाया जाण्याची भीती आहे. काही ठिकाणी कोवळी पिके जळण्यास सुरुवात झाली आहे.पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे आहेत. बाजारात शांतता आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. खरिपात महत्त्वाचे असलेल्या कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली असली तरी या पिकांचे अंकुर फुटत आहेत. गतवर्षी पडलेल्या चांगला पाऊस पडला. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करीत ठिबकसंच घेतले. पाऊस न झाल्याने उपलब्ध पाणीसाठाही आता आटत आहे. आठवडी बाजार शांतता- ग्रामीण भागातील अर्थ व्यवहाराचे प्रमुख केंद्र असलेले आठवडी बाजार गत दोन ते तीन महिन्यांपासून शांतच आहे. पाऊस न पडल्याने बाजारातील उलाढाल कमालीची मंदावली आहे. (वार्ताहर)महिनाभरात जेमतेमच पाऊसपावसाळा सुरू होऊन जवळपास महिना उलटला आहे़ मात्र जोरदार पावसाचे आगमन चार ते पाच दिवस मिळून एकदा होत असल्याने यावर्षीची पिकांचे उत्पनाविषयी शेतकऱ्यांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़ यामुळे रबी पिकांचे क्षेत्र देखील धोकयात येण्याचे संकेत दिसू लागले आहेत.आता पडलेल्या पावसावरच रबी पिकांचे भवितव्य अवलंबून असते़ मात्र सध्या या पिकांसाठी सुध्दा जोरदार पावसाची नितांत गरज असल्याचे जाणकार शेतकऱ्यांतून बोलले जात आहे़