शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

स्वागत अन् विसर्जनही ‘दणक्यात’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:53 IST

अकरा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या बाप्पाला बाराव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी निरोप दिला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अकरा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या बाप्पाला बाराव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनासह गणेश मंडळाचे नियोजन पूर्ण झाले असून, ते विसर्जनासाठी सज्ज झाले आहेत. परंतु, स्वागत अन् विसर्जनही रस्त्यावरील खड्ड्यांतून होणार असल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचा खटाटोप, आवाहन केवळ कागदोपत्री असल्याचेच दिसून येत आहे.२५ आॅगस्ट रोजी गणरायाचे हर्षोल्हासात आगमन झाले होते. यावर्षी गणराय वरुणराजासोबत आले. त्यामुळे सर्वत्र आनंदीआनंद व्यक्त करण्यात आला. या अकरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी, अतिवृष्टी, रिमझिम पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नदी-नाले, ओढे, तलाव, लघु-मध्यम प्रकल्प पाण्याने भरले. तसेच पिकांनाही दिलासा मिळाल्याने बळीराजाही सुखावला आहे. या सर्व परिस्थितीमुळे यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा झाला.दरम्यान, यंदा जिल्ह्यात १२४१ ठिकाणी बाप्पांची प्रतिष्ठापना झाली आहे. ४९ गावांमध्ये ‘एक गाव दोन गणपती’, तर ३४९ गावांमध्ये ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. एका ठिकाणी ‘दोन गाव एक गणपती’ बसविण्यात आला.डीजेवर मिरवणुकीत बंदी असल्यामुळे पारंपरिक वाद्यांचे दर्शन सर्वसामान्यांना घडणार आहे. हा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.