शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

Aurangabad Violence : दंगल आटोक्यात आणण्यात कमी पडलो; पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची स्पष्ट कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:21 IST

दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबाद : शहरात दंगल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन समुदाय आमने सामने आले आणि जाळपोळ आणि जोरदार दगडफेक सुरू झाली. या दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबादेत दंगल पेटल्याचे कळताच बिहारी यांनी शनिवारी सायंकाळी औरंगाबादेत धाव घेतली. त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. ज्या घरावर रॉकेलचे बोळे आणि दगड सापडले त्या घरांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील दोन्ही समुदायातील जाणकारांशी चर्चा केली. रविवारी सकाळी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकाऱ्यांकडून दंगलीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महासंचालक म्हणाले की, दंगलीच्या तत्कालीन कारणाशिवाय अन्य कारणेही असल्याचे समोर आले.

गांधीनगरातील तत्कालिक भांडण, महानगरपालिकेने अवैध नळ कनेक्शनविरोधात आणि रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात सुरू केलेली कारवाईही यास कारणीभूत आहे. शासकीय यंत्रणेच्या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घेण्यात येईल, त्याकरिता सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिका-यांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे.

रात्री सुरू झालेली दंगल दुस-या दिवशी दुपारपर्यंत का नियंत्रणात आणता आली नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, दंगलीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात पोलीस कमी पडले. दंगलीचा सामना करताना पोलिसांकडून मिळालेल्या रिस्पॉन्समध्ये गॅप होता. हा गॅप का निर्माण झाला आणि दंगल का चिघळली, याबाबत चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले. शहर आता पूर्वपदावर आले असले तरी यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी पोलिसांना जनसंपर्क वाढवून अलर्ट राहावे लागेल.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार