शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : दंगल आटोक्यात आणण्यात कमी पडलो; पोलीस महासंचालक बिपीन बिहारी यांची स्पष्ट कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 11:21 IST

दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबाद : शहरात दंगल सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत दोन समुदाय आमने सामने आले आणि जाळपोळ आणि जोरदार दगडफेक सुरू झाली. या दंगलखोरांना रोखण्यासाठी पोलीस कमी पडल्याने शहर धुमसत राहिले, अशी स्पष्ट कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

औरंगाबादेत दंगल पेटल्याचे कळताच बिहारी यांनी शनिवारी सायंकाळी औरंगाबादेत धाव घेतली. त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. ज्या घरावर रॉकेलचे बोळे आणि दगड सापडले त्या घरांचीही त्यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरातील दोन्ही समुदायातील जाणकारांशी चर्चा केली. रविवारी सकाळी सिटीचौक पोलीस ठाण्यात त्यांनी अधिकाऱ्यांकडून दंगलीचा आढावा घेतला. या बैठकीला प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त राहुल श्रीरामे, औरंगाबाद ग्रामीणच्या अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महासंचालक म्हणाले की, दंगलीच्या तत्कालीन कारणाशिवाय अन्य कारणेही असल्याचे समोर आले.

गांधीनगरातील तत्कालिक भांडण, महानगरपालिकेने अवैध नळ कनेक्शनविरोधात आणि रस्त्यावरील हातगाड्यांविरोधात सुरू केलेली कारवाईही यास कारणीभूत आहे. शासकीय यंत्रणेच्या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची खबरदारी घेण्यात येईल, त्याकरिता सर्व शासकीय यंत्रणेच्या अधिका-यांची बैठक लवकरच घेण्यात येणार आहे.

रात्री सुरू झालेली दंगल दुस-या दिवशी दुपारपर्यंत का नियंत्रणात आणता आली नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना महासंचालक म्हणाले की, दंगलीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात पोलीस कमी पडले. दंगलीचा सामना करताना पोलिसांकडून मिळालेल्या रिस्पॉन्समध्ये गॅप होता. हा गॅप का निर्माण झाला आणि दंगल का चिघळली, याबाबत चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले. शहर आता पूर्वपदावर आले असले तरी यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी पोलिसांना जनसंपर्क वाढवून अलर्ट राहावे लागेल.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार