शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

५ दिवस पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: October 20, 2016 01:43 IST

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे

औरंगाबाद : दिवाळीत औरंगाबादकरांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी मनपा प्रशासन गुरुवारी सकाळी ९ वाजेपासून २४ तासांचे शटडाऊन घेणार आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. मनपाने शटडाऊनची घोषणा दोन दिवसांपूर्वीच केली होती.तीन महिन्यांपासून शहराचा पाणीपुरवठा नेमका कोणाकडे आहे, हेच कळायला मार्ग नाही. समांतर जलवाहिनीच्या ठेक्याचा वाद न्यायालयात सुरू आहे. आज पाणीपुरवठा कंपनीकडे तर दुसऱ्या दिवशी मनपाकडे असतो. कंपनी व मनपाच्या भांडणात सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेक वसाहतींना नियोजित वेळी आणि नियोजित दिवशी पाणीच मिळायला तयार नाही. वेदांतनगर, ज्युबिली पार्क, मोंढानाका येथे मोठे लिकेज निर्माण झाले आहेत. दुरुस्तीचे काम मनपा आणि कंपनी करायला तयार नाही. दोन दिवसांपूर्वी सिडको-हडकोतील नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन दिवाळीत तरी पाणीपुरवठा सुरळीत ठेवा, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी पाणीपुरवठ्यात लक्ष घालणे सुरू केले. दिवाळीत पाणीपुरवठ्याची एकही तक्रार येणार नाही, यादृष्टीने नियोजन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.