शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

जलसंकट तीव्र

By admin | Updated: May 17, 2016 00:03 IST

नांदेड : विष्णूपुरीतील पाणीपातळी खालावल्याने दक्षिण नांदेड भागावरील जलसंकट तीव्र झाले असून आता आपातकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तयारीला लागण्याचे

घोषणांचा पाऊस : उपाययोजनाही कागदावरनांदेड : विष्णूपुरीतील पाणीपातळी खालावल्याने दक्षिण नांदेड भागावरील जलसंकट तीव्र झाले असून आता आपातकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने तयारीला लागण्याचे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी दिले आहेत़ त्याचवेळी महापालिकेचे पदाधिकारी मात्र विष्णूपुरीचे दौरे करीत घोषणाबाजीच करीत आहेत़महापालिका हद्दीत विष्णूपुरी आणि पर्यायी पाणीपुरवठा योजना असलेल्या आसना नदीतून पाणी पुरवले जात आहे़ इसापूर प्रकल्पात पाणी राखीव ठेवल्याने आणि पर्यायी योजना वेळीच कार्यान्वित केल्याने उत्तर नांदेडातील पाणीप्रश्न सध्यातरी उद्भवला नाही़ त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला जवळपास ३० टक्के शहराला पाणीपुरवठा केला जातो़ त्यात सिडको, हडको, वसरणी, कौठासह जुन्या नांदेडातील काही भागांचाही समावेश आहे़ विष्णूपुरीतील जिवंत जलसाठा संपल्याने सध्या मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे़ या मृत जलसाठ्यातून दक्षिण नांदेडची १५ ते २० दिवस तहान भागू शकणार आहे़ त्यात मान्सूनचे आगमन वेळेत झाले नाहीतर मोठे जलसंकट उद्भवणार आहे़ या जलसंकटाची कल्पना असूनही महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या वादामुळे कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत़ आता जलसंकट तोंडावर आले असताना उपाययोजना आखण्यात येत आहेत़ त्यातही अपुऱ्या माहितीच्या आधारे जलसंकट निवारण्याचा प्रयत्न केला जात आहे़ ही परिस्थिती ओळखून महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी काकाणी यांनी पाणीपुरवठा विभागाला गांभीर्याने काम करण्याचे आदेश दिले आहेत़ विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यास आपातकालीन परिस्थितीत महापालिका हद्दीतील विहिरी, बोअरचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत़ या विहिरी स्वच्छ करून तसेच बंद पडलेले बोअर सुरू करावेत असेही ते म्हणाले़ वेळ पडल्यास महापालिका खाजगी बोअर, विहिरीही ताब्यात घेवून पाणीपुरवठा करू शकते़ यासाठी खाजगी विहिरी व बोअरचेही सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले़ प्रभारी आयुक्तांनी केलेल्या सूचना पाहता जलसंकटाचे गांभीर्य पुढे येत आहे़महापालिकेच्या पर्यायी पाणीपुरवठा योजना अर्थात आसना नदीवरून कोटीतीर्थपर्यंत पाणी नेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत प्रस्ताव सादर करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत़ जवळपास ६ कोटी ५० लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता़ तो नव्याने पाठविण्यात येणार आहे़