शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वाळूजमध्ये जलकुंभ उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:38 IST

वाळूज येथे ग्रामनिधीतून ४८ लाख रुपये खर्च करुन नवीन ७ लाख लिटर क्षमतेचा जलुकंभ उभारण्यात येणार आहे.

वाळूज महानगर : वाळूज येथे ग्रामनिधीतून ४८ लाख रुपये खर्च करुन नवीन ७ लाख लिटर क्षमतेचा जलुकंभ उभारण्यात येणार आहे. जलकुंभाच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर करण्यात आले. या जलकुंभामुळे गावात सुरळीत पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

वाळूज गावाचा पाणी प्रश्न तीन दशकांपासून गाजत असून, नागरिकांना बाराही महिने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी दशकभरापूर्वी पाच कोटी रुपये खर्चाची राष्टÑीय पेयजल योजना राबविण्यात आली. मात्र, टेंभापुरी मध्यम प्रकल्पात जलसाठा होत नसल्यामुळे या योजनेवर झालेला निधी पाण्यात गेला आहे.

दिवंगत सरपंच सुभाष तुपे व ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर वर्षभरापूर्वी एमआयडीसी प्रशासनाने वाळूजला पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली. तसेच ग्रामपंचायतीने नवीन जलवाहिनी व जलकुंभ उभारण्यासाठी ग्रामनिधी, क्लस्टर व १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ६५ लाख रुपये खर्च करुन ४ मीटरची ६ इंच व्यासाची जलवाहिनी टाकली आहे.

एमआयडीसीकडून ग्रामपंचायतीला दररोज जवळपास १४ लाख लिटर पाणी पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. वर्षभरापासून गावात एमआयडीसीचा पाणी पुरवठा सुरु करण्यात आलेला आहे. एमआयडीसीकडून येणारे पाणी रामराईरोडवरील जलकुंभात साठवून गावात पाणी पुरवठा करण्यात येतो.

मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत हा जलकुंभ अपुरा ठरत असल्यामुळे सरपंच पपीन माने, उपसरपंच मनोज जैस्वाल, ग्रामविकास अधिकारी एस. सी.लव्हाळे व सदस्यांनी नवीन जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेतला होता. कार्यक्रमाला माजी सभापती ज्ञानेश्वर पा.बोरकर, सदस्य अनिल साळवे, लक्ष्मणराव पा.पाठे, रवी मनगटे, संजय शिंदे, हापीज पटेल, नंदु सोनवणे, पोपट बनकर, सिद्धेश्वर ढोले, उत्तम बनकर, चेअरमन सर्जेराव भोंड, शरदचंद्र अभंग, ज्ञानेश्वर देसाई,ताजु मुल्ला, रोहित श्रीमाळी, अस्लम शेख, महेश पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Walujवाळूजwater shortageपाणीकपात