शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

हिंगोलीतही पाणी अपव्यय

By admin | Updated: April 23, 2016 23:54 IST

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे.

हिंगोली : दुष्काळी स्थितीमुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. लातूरला तर रेल्वेने पाणीपुरवठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरातील पाण्याच्या अपव्ययाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.हिंगोलीत चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाण्यासाठी तेवढी ओरड नाही. नवीन जलवाहिनी टाकूनही अनेक भागात पुरेसे पाणी नाही. जुन्या वाहिनीवर पाणीपुरवठा होणाऱ्या भागात गळतीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. आदर्श महाविद्यालय परिसरात नेहमी या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अकोला रोडवर दोन-तीन ठिकाणी गळती होत आहे. नारायणनगर परिसरातही अधूनमधून असे चित्र पहायला मिळते. सिद्धार्थनगरातही असाच प्रकार घडत आहे. एवढेच काय तर हिंगोलीला सिद्धेश्वरहून येणाऱ्या वाहिनीचे व्हॉल्व्हही ठिकठिकाणी गळत आहेत. त्यावर अनेकजण पाणी भरताना दिसतात. त्यामुळे नगरपालिकेने या सर्व प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.शहराच्या नजीकच्या भागात एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असताना दुसरीकडे शहरात मात्र अशाप्रकारे पाणी वाया जात आहे. नजीकच्या खेड्यांतही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अंधारवाडी, बळसोंडमध्ये गंभीर चित्र आहे. कारवाडी, सुराणानगर आदी भागांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. हिंगोलीकरांना सध्यातरी ही वेळ आली नसली तरीही पाणी वापराबाबत सजग राहावे लागणार आहे. नळांना तोट्या बसविणेही तेवढेच गरजेचे आहे. सिद्धेश्वरचे पाणीही जोत्याखाली गेल्यातच जमा आहे. येलदरी तर अगोदरच जोत्याखाली गेलेले आहे.