शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘तेरणा, वाघोली’तूनही पाणी उपसा

By admin | Updated: November 7, 2014 00:41 IST

तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे.

तेर : येथील तेरणा प्रकल्पामध्ये सध्या केवळ १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा असतानाही प्रकल्पातून शेतीसाठी पाणीउपसा होत आहे. त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी या धरणावर अवलंबून असलेल्या गावांना टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत.यंदा तेरणा धरण क्षेत्र परिसरामध्ये अत्यल्प पावसामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. दरम्यान, या धरणातून तेर, ढोकी, तडवळा आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु, सध्या या प्रकल्पामध्ये अवघा १० ते १५ टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा आहे. असे असतानाच धरण परिसरातील शेतकरी विशेषत: रात्रीच्यावेळी शेतीसाठी पाणीऊपसा करीत आहेत. असाच पाणीउपसा सुरू राहिल्यास भविष्यात उपरोक्त चारही गावांना भीषण तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, हा प्रश्न लक्षात घेवून ग्रामपंचायतीने ३ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून अनधिक्रतपणे सुरू असलेला पाणीउपसा थांबविण्याची मागणी केली आहे. परंतु, अद्यापही धरणक्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही. याबाबत शाखा अभियंता आय. पी. बांगड यांच्याशी संपर्क साधला असता वीजपुरवठा खंडित करण्याबाबत महावितरणला पत्र दिल्याचे सांगितले आहे. (वार्ताहर)तेर : तालुक्यातील वाघोली येथील मध्यम प्रकल्पामध्ये सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. परंतु, येथेही मोटारींचे मोठे जाळे दिसून येत आहे. भविष्यातील टंचाईचे चित्र लक्षात घेवून शेतीसाठी पाणीउपसा करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. परंतु, येथेही बेसुमार पाणीउपसा सुरू असून, तो तसाच सुरू राहिल्यास भविष्यात परिसरातील गावांनाही टंचाईचे चटके सोसावे लागणार आहेत. जिल्ह्यात चालू वर्षी सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडला आहे. परिणामी आतापासूनच अनेक गावांना टंचाईचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे ज्या प्रकल्पांमध्ये पाणी आहे, ते पिण्यासाठी आरक्षित करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे असतानाही सध्या या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात खुलेआम पाणीउपसा करण्यात येत आहे. असे असतानाही कारवाईचे धाडस प्रशासनाकडून दाखविले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.