शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

तुळजापूर शहराला दूषित पाणीपुरवठा !

By admin | Updated: May 3, 2016 00:18 IST

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला बोरी धरणातून दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

आरोग्य धोक्यात : पालिकेने लक्ष देण्याची मागणीतुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला बोरी धरणातून दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, यामुळे शहरवासीयांसह देवी दर्शनानिमित्त येणार भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील नळदुर्ग व अणदूर या गावांना बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात सद्य$:स्थितीत केवळ १.१० दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंतही तो पुरेल की नाही, अशी शंका आहे. दुसरीकडे पाणीपातळी खालावल्यामुळे शहरासह परिसरातील बहुतांश बोअर बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह बाहेरगावाहून देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचाच आधार आहे. परंतु, विकास प्राधीकरणाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले असले तरी शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) नागरिकांत संताप : जलशुद्धीकरण केंद्रावर लाखोंचा खर्चपाणी विक्री जोरातशहरात दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने अनेक नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत सुरु आहे. या विक्रेत्यांकडूनही अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पालिकेनेच शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. लवकरच दुरुस्ती : मगरयासंदर्भात नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजूषा मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, चैत्रपौर्णिमा यात्रेपूर्वीच पूर्ण फिल्टर स्वच्छ करण्यात आले होते. शहरात जीवन प्राधिकरणाच्या नवीन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून, या पाईपलाईनचे हॅण्डवर्क झालेले नाही. कुठेतरी जलवाहिनी लिकेज असल्यामुळे दूषित पाणी येत आहे. याची लवकरच पाहणी करून लिकेज दुरूस्त केले जाईल, असे त्यांनी सांगितले.